Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटकला अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास सांगा; कोल्हापूर, सांगलीतील कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

 

कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दोन जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी पत्र लिहून केली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यास कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सांगावे, अशी मागणी या पत्रातून केली आहे. अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग न केल्यास पश्चिम महाराष्ट्रात पुरस्थिती निर्माण होऊ शकते, हे वारंवार दिसून आले आहे.

कर्नाटकचा पाटबंधारे विभाग केंद्रीय जल आयोगाच्या धरणांमधील पाणीसाठ्याबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आयोगाच्या मते, 15 ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणाचा साठा 512 मीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तथापि, कर्नाटकच्या पाटबंधारे विभागाने ऑगस्टमध्ये कमी पावसाच्या भीतीने धरण जास्तीत जास्त क्षमतेने भरण्याचा पवित्रा घेतला आहे.

कार्यकर्ते मंचचे निमंत्रक सर्जेराव पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी आमची इच्छा आहे. अधिकाऱ्यांसोबत आमच्या वारंवार झालेल्या बैठकांमध्ये, कर्नाटकने सिडब्ल्यूसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनाचे पालन होत नाही. रविवारी पाण्याची पातळी 516 मीटर होती. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. अशीच स्थिती राहिल्यास सांगली आणि शिरोळला पूर येईल.

कोणत्याही सरकारी अभ्यासात पुरामध्ये अलमट्टीची भूमिका दिसून येत नसली तरी, आम्ही वेळोवेळी सिद्ध केले आहे की ते एक प्रमुख कारण आहे. हा आंतरराज्यीय प्रश्न असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात पाऊल टाकावे अशी आमची अपेक्षा असल्याचे सर्जेराव पाटील म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

अजितदादांच्या विमानाचा अपघात नाही तर घातपात; रोहित पवारांना मोठा संशय

Spread the love  मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला बारामतीत विमान अपघातामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *