चित्तूर : दोन लॉरींची आणि बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाल्याची घटना आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मोगलीघाटजवळ घडली.
दोन लॉरींची टक्कर झाली आणि एक लॉरी दुभाजकाला धडकली आणि नंतर बाजूच्या रस्त्यावरून येणाऱ्या बसला धडकली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. 30 जण गंभीर जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.