Sunday , September 8 2024
Breaking News

भाजपकडे आंदोलन करण्याची नैतिकता नाही

Spread the love

 

मुख्यमंत्र्यांचा भाजपवर घणाघात; मोदींच्या काळात इंधन दरात मोठी वाढ

बंगळूर : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करण्याची भाजपकडे नैतिकता नसल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे. नरेंद्र मोदी केंद्रात पंतप्रधान झाल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाल्याचा पलटवार त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या गृह कार्यालय कृष्णा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर वाढीचा बचाव करताना ते म्हणाले, की विकास कामांसाठी अधिक संसाधने एकत्रित करण्यासाठी आम्ही पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर वाढविला आहे. मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात जीएसटी लागू झाल्यानंतर, राज्यांना संसाधन एकत्रित करण्यासाठी तेल, उत्पादन शुल्क आणि मुद्रांक शुल्कावर कर वाढवण्याचा अधिकार देण्यात आला आहे. ते म्हणाले की, आता विकासकामांसाठी अधिक पैसे द्यावेत यासाठी आम्ही तेलाच्या किमती काही प्रमाणात वाढवल्या आहेत.
राज्यात पेट्रोल-डिझेलवरील विक्रीकर वाढीसाठी लढणाऱ्या भाजपच्या लोकांमध्ये आमच्याविरुद्ध लढण्याची नैतिकता नाही. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. उत्पादन शुल्कातही वाढ झाली आहे. जर त्यांनी विरोध केला तर तो केंद्राच्या विरोधात असावा, असा प्रतिवाद त्यांनी केला.
यापूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पेट्रोलचा दर ७२ रुपये होता. मोदी पंतप्रधान झाल्यापासून तो १०० रुपयांच्या पुढे गेला आहे. तसेच डिझेलच्या दरातही वाढ झाली आहे. याशिवाय पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातही तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. अशा स्थितीत भाजपने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात अर्थ नाही. त्यांनी केंद्राच्या विरोधात निदर्शने करावित.
हमी योजनांच्या निधीसाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवण्यात आल्याच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याला उत्तर देताना ते म्हणाले की, हमी योजनांसाठी ६० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर वाढल्याने ३ हजार कोटी रुपये उत्पन्न मिळेल. भाजपसाठी विशेषत: विरोधी पक्षनेते आर. अशोक यांना अर्थशास्त्र माहीत नसल्याची टीका त्यांनी केली.
भाजपचे नेते राज्य सरकार दिवाळखोर असल्याबद्दल बोलत असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला आणि ते म्हणाले, “दिवाळखोर म्हणजे काय हे आंदोलनकर्त्या भाजपवाल्यांना माहीत आहे का? आम्ही पगार बंद केले का, विकासकामांसाठी आम्ही अनुदान दिले नाही का, असे असतानाही भाजप राज्य सरकार दिवाळखोर असल्याची निरर्थक विधाने करत आहे.
भाजप गरीब विरोधी आहे, गरीबांना हमी योजना दिल्या म्हणून ते असे बोलत आहेत. गरीबांना मारण्याच्या भाजपच्या कामावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ताशेरे ओढले, आम्ही गरीबांना हमी योजना दिल्या आहेत, श्रीमंतांना नाही. पंतप्रधान मोदींप्रमाणे अंबानी आणि अदानी यांची कर्जमाफी केलेली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी करा म्हणून मागणी केली तर ते करायला तयार नाहीत. हेच भाजपवाले आम्हाला शिकवायला येता आहेत, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
केंद्राकडून राज्यांना मिळणारा कर वाटा अन्यायकारक, दुष्काळी मदत देण्यास होणारा विलंब यामुळे भाजप आता आमच्याविरोधात आंदोलन करत आहे. हिंमत असेल तर आमच्या कर आणि हक्काच्या मागणीच्या लढ्यात सहभागी होऊन राज्याला न्याय मिळवून द्या, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.

भाजपशासित राज्यात इंधनाचे दर अधिक
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने विकासकामांसाठी अधिक पैसा जमा होणार आहे. त्यामुळे आम्ही इतर राज्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात कर वाढवला आहे. भाजपशासित महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये कर आणि डिझेलचे दर राज्यापेक्षा जास्त आहेत. तिथे कमी करण्यास सांगा. मग आमच्या विरोधात आंदोलन करा, असा पलटवार त्यांनी केला.

About Belgaum Varta

Check Also

मला “चिंता किंवा तणावग्रस्त” होण्याचे कारणच नाही

Spread the love  मुख्यमंत्री सिध्दरामय्या; विरोधकांचा दावा फेटाळला बंगळूर : म्हैसूर शहर विकास प्राधिकरण (मुडा) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *