Saturday , March 22 2025
Breaking News

ग्राहकाना वीज दरवाढीचा शॉक; प्रति युनिट ३६ पैसे दरवाढ

Spread the love

 

पुढील दोन वर्षात अनुक्रमे ३५ व ३४ पैसे दरवाढीस मंजूरी

बंगळूर : बस भाडे आणि मेट्रो भाडे यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्यानंतर कर्नाटक वीज आयोगाने (केईआरसी) ग्राहकांना विजेचा शॉक दिला आहे. वीजदरात प्रति युनिट ३६ पैसे वाढ करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुधारित दर एक एप्रिलपासून लागू होईल.
निवृत्ती वेतन ग्रॅच्युइटीच्या नावाखाली केलेल्या ३६ पैशांच्या वाढीमुळे प्रति कुटुंब अंदाजे ९० रुपये वीज बिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
याशिवाय, केईआरसीने २०२५-२६ मध्ये ग्राहकांनी वापरलेल्या विजेच्या प्रति युनिट ३६ पैसे, २०२६-२७ मध्ये प्रत्येकी ३५ पैसे आणि २०२७-२८ मध्ये प्रत्येकी ३४ पैसे अतिरिक्त शुल्क आकारण्यास मान्यता दिली आहे.
वीज प्रसारण आणि पुरवठा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा पेन्शन आणि ग्रॅच्युइटीचा हिस्सा ग्राहकांच्या खिशातून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी वीज ग्राहकांना दरवाढीमुळे मोठा शॉक बसणार आहे.
जेव्हा राज्य सरकारने केईबी रद्द करून केपीटीसीएल आणि ५ एससीओएम निर्माण केले, तेव्हा कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि ग्रॅच्युइटी सरकार उचलेल असे मान्य केले होते.
तथापि, त्यांनी २०२१ पासून पैसे देण्यास सहमती दर्शविली नाही. हे पैसे ग्राहकाला हस्तांतरित करण्यास सांगण्यात आले. २०२१ मध्ये जेव्हा हा मुद्दा केईआरसीसमोर उपस्थित करण्यात आला तेव्हा आयोगाने त्यांची संमती न देता तो स्पष्टपणे नाकारला.
२५ मार्च २०२४ ला जेव्हा हे प्रकरण उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आले तेव्हा उच्च न्यायालयाने ग्राहकाना पेन्शन हस्तांतरित करण्यास स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, केईआरसीने लोकांवर भार लादला आहे आणि वीजदरात प्रति युनिट ३६ पैसे वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे.
सरकारी आदेशानुसार, २०२१ ते २०२४ पर्यंत ४,६५९ कोटी रुपये वाटप केले जातील. पैसे गोळा करावे लागतील आणि ग्राहकाला चालू वर्षापासून हे पैसे सहा हप्त्यांमध्ये भरावे लागतील.
वीज दरवाढीचा सर्वसामान्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. गृहज्योती योजनेमुळे कोणतेही नुकसान होत नाही. घरगुती वीज तोट्यामुळे वीजदरात वाढ करण्यात आलेली नाही, असे मंत्री शरण प्रकाश पाटील यांनी सांगितले.
बंगळुरमध्ये उत्तर देताना ते म्हणाले, “आम्ही गृह ज्योती योजनेअंतर्गत २०० युनिट वीज मोफत देत आहोत. त्यांनी सांगितले की, ही दरवाढ २०० युनिटपेक्षा जास्त वीज वापरणाऱ्या ग्राहकांना लागू होईल.

दर वाढीस भाजपचा विरोध
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी वीज दर वाढवण्याच्या आणि ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. विधान सौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वाढत्या किमतींबद्दल सरकारवर टीका केली.
काँग्रेस सरकार दरवाढ लागू करत आहे. तर राज्यातील जनता महागाईमुळे हैराण झाली आहे, असे ते म्हणाले.
एकीकडे, ते म्हणतात की ही मोफत वीज आहे. दुसरीकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडेच आठ हजार रुपयाची वीज थकबाकी आहे. आम्ही या सर्व मुद्द्यांवर सभागृहात चर्चा करू, असे ते म्हणाले.

सर्वसामान्यांना अडचण नाही
यावर बोलताना मंत्री शरण प्रकाश पाटील म्हणाले, ‘वीज दरवाढीमुळे सर्वसामान्यांना कोणतीही गैरसोय होणार नाही. गृहज्योती योजनेमुळे कोणतेही वाढवलेले नाहीत. असे त्यांनी स्पष्ट केले.
‘गृहज्योतीच्या नुकसानीमुळे वीजदर वाढवलेले नाहीत. आम्ही २०० युनिट वीज मोफत दिली आहे. २०० पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्यांना ही दर वाढ लागू होईल. भाजप श्रीमंतांच्या वतीने बोलत आहे. सरकार किंमती वाढवणार नाही. स्वायत्त संस्था किमती वाढवते. या प्रकरणात भाजपचे आरोप खरे नाहीत,” असे ते म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

मुस्लिमांना सरकारी कंत्राटामध्ये आरक्षणाचे विधेयक विधानसभेत सादर

Spread the love  बंगळूर : सरकारी कंत्राटी कामांमध्ये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण आणि मागासवर्गीयांना वस्तू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *