Monday , December 8 2025
Breaking News

यादगिरीत दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू

Spread the love

 

सहा जणांची प्रकृती गंभीर

बंगळूर : यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील तिप्पनतागी गावात दूषित पाणी पिऊन तीन जणांचा मृत्यू झाला. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
मृतांची ओळख देविकेम्माहोट्टी (वय ४८), वेंकम्मा (वय ६०) आणि रामण्णा पुजारी (वय ५०) अशी आहे. १० दिवसांपूर्वी दूषित पाणी पिऊन उलट्या आणि जुलाब झाल्याने तिप्पनतागी ग्रामस्थांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारात यश न आल्याने तिघांचा मृत्यू झाला.
७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक जण बरे झाले आहेत, परंतु २० जण अजूनही आजारी आहेत.
सुरपुर तालुका अधिकारी राजवेंकटप्पा यांनी तिप्पनतागी गावाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश बिरादार यांनी उलट्या आणि जुलाब प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *