Sunday , July 26 2026
Breaking News

यादगिरीत दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू

Spread the love

 

सहा जणांची प्रकृती गंभीर

बंगळूर : यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील तिप्पनतागी गावात दूषित पाणी पिऊन तीन जणांचा मृत्यू झाला. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.
मृतांची ओळख देविकेम्माहोट्टी (वय ४८), वेंकम्मा (वय ६०) आणि रामण्णा पुजारी (वय ५०) अशी आहे. १० दिवसांपूर्वी दूषित पाणी पिऊन उलट्या आणि जुलाब झाल्याने तिप्पनतागी ग्रामस्थांना खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज उपचारात यश न आल्याने तिघांचा मृत्यू झाला.
७ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक जण बरे झाले आहेत, परंतु २० जण अजूनही आजारी आहेत.
सुरपुर तालुका अधिकारी राजवेंकटप्पा यांनी तिप्पनतागी गावाला भेट देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश बिरादार यांनी उलट्या आणि जुलाब प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *