Tuesday , March 3 2026
Breaking News

दोन मुलींची हत्या करून आईची आत्महत्या

Spread the love

 

पेरियापट्टण येथे दुर्दैवी घटना

बंगळूर : म्हैसूर जिल्ह्यातील पेरियापट्टण तालुक्यातील बेथाडपुर येथे शनिवारी एक हृदयद्रावक घटना घडली. २५ वर्षीय महिलेने तिच्या दोन लहान मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मृत महिलेचे नाव अरबिया भानू (२५) असून ती बेथाडपुर येथील सुन्नदा बीडी परिसरातील रहिवासी जमरुद शरीफ यांची मुलगी आहे. तिने आपल्या दोन मुली अनम फातिमा (वय २ वर्षे) आणि आठ दिवसांच्या नवजात बाळाचा गळा चाकूने कापून ठार केल्याचा आणि त्यानंतर स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या केल्याचा आरोप आहे.
अरबिया भानूचे लग्न अरेनहळ्ळी गावातील सय्यद मुसावीर यांच्याशी झाले होते. ती गृहिणी होती. तक्रारीनुसार, मोठे अपत्य अपंग असल्याने आणि नवजात बाळही मुलगी असल्याने ती मानसिक तणावात होती. निराशेमुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सी. मल्लिक, सर्कल इन्स्पेक्टर दीपक, तहसीलदार निसर्गप्रिया आणि पीएसआय अजयकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सी. मल्लिक यांनी सांगितले की, “खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. प्रथमदर्शनी हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे दिसते. तक्रारीनुसार, दोन मुली असल्याने ती अस्वस्थ होती. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.”

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *