Tuesday , March 3 2026
Breaking News

जारकीहोळी यांचा वाल्मिकी, रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? : मुख्यमंत्री बोम्माई

Spread the love

 

खानापूर : वाल्मिकी श्रेष्ठ कुलतिलक, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का..? तुमचा महर्षि वाल्मिकींचा रामायण ग्रंथ आणि श्रीरामावर विश्वास आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना तुम्ही आधी या प्रकरणाचा खुलासा करा असे खुले आव्हान दिले.

खानापूर शहरातील मलप्रभा मैदानावर आयोजित भाजप जनसंकल्प यात्रेत बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, जनसंकल्प यात्रा गेल्या महिन्यापासून अखंडपणे सुरू आहे. आम्ही आज 9 व्या जिल्ह्यात पोहोचलो आहोत. सर्वच क्षेत्रात लोक आम्हाला आशीर्वाद देत आहेत. आमचा संकल्प हा जनतेची इच्छा आहे, आमचा संकल्प कन्नड राष्ट्राच्या उभारणीचा आहे, आमचा संकल्प नवीन कर्नाटकातून नवा भारत घडवण्याचा आहे. या देशाच्या उभारणीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, संस्कृती वाचवण्यासाठी लढा दिला. या पवित्र भूमीत बुद्ध, बसव, महावीर यांचा जन्म झाला. स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचा संस्कृती वाचवण्याचा लढा, कित्तूर राणी चन्नम्मा यांचा इंग्रजांविरुद्धचा लढा, क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचे बलिदान वाया जाऊ नये. आम्ही स्वतःला विचलित होऊ देत नाही. भाजप हा देशाचे रक्षण करणारा, देश घडवणारा पक्ष आहे. आमचे नेते मोदी म्हणाले सब का साथ सब का विकास. भारताच्या विकासामध्ये सर्वांचा विकास समाविष्ट आहे. शंभर वर्षे पार केलेला काँग्रेस पक्ष आहे. इंग्रजांनी आम्हाला तोडून 200 वर्षे राज्य केले. त्यापूर्वी मुघलांनी 700 वर्षे राज्य केले. सत्तेसाठी देशाची फाळणी करून आणीबाणी जाहीर करणार्‍या इंग्रजांनी फुटीर राज्याचे धोरण काँग्रेसला दिले. काँग्रेस पक्षानेच आंबेडकरांना निवडणुकीत पराभूत केले आणि आंबेडकरांचे निधन झाले तेव्हा त्यांना दिल्लीत 6 फूट बाय 6 फूट जागाही देण्यात आली नाही. काँग्रेसने खलिस्तान आणि नक्षलवादी निर्माण केल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्र्यानी केली.

एकीकडे राहुल भारत जोडो यात्रा करत आहेत. दुसरीकडे सतीश जारकीहोळी भारताचे तुकडे करण्याचे काम करत आहेत. ते हिंदू शब्दाला गलिच्छ म्हणत आहेत. ते कोणत्या तोंडून सांगत आहेत. त्यांची मानसिकता गलिच्छ आहे. वाल्मिकी कुळातील सतीश जारकीहोळी यांचा वाल्मिकींवर विश्वास नाही का..? वाल्मिकी हे महान कुलतिलक आहेत, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता का..? त्यांनी लिहिलेल्या रामायणावर तुमचा विश्वास असता तर तुम्ही असे बोलला नसता. प्रथम रामाबद्दल स्पष्ट करा. त्याच्या भावाचे नाव लक्ष्मण आहे. त्याचप्रमाणे तुमच्या भावाचे नावही लक्ष्मण आहे, मग तुम्हाला हे माहीत नाही..? तुमच्या शाळेच्या रेकॉर्डमध्ये काय आहे..? ते पहा. आता तुम्ही राजकारण आणि तुष्टीकरणासाठी असे बोलत आहात. तुमचा जन्म कुठल्या वारशात, संस्कृतीत झाला असेल, त्याबद्दल बोलून तुम्हाला काही फायदा होणार नाही. सभेत कितीही बोलला तरी त्याने आमचा विश्वास आणि भक्कम पाया धोक्यात आणला आहे. आज जनता या विरोधात उभी आहे. लोक ठरवत आहेत की ज्यांचा आमच्या विश्वासावर विश्वास नाही त्यांना आमच्यावर राज्य करण्याचा अधिकार नाही. देश, संस्कृती, वारसा ही श्रद्धा असते. या विश्वासावर आपल्या सर्वांचे भविष्य अवलंबून आहे. आताच नव्हे, तर भविष्यातही या मन:स्थितीला सत्ता द्यायची नाही, असा संकल्प लोकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.पाच वर्षांत, 28 भाग्य योजनांची घोषणा केलीत, त्याचा कोणालाही फायदा झाला नाही. आता तुम्ही पुन्हा सत्तेत येणार असे म्हणत होता. यावेळी काँग्रेसला पूर्णपणे घरी पाठवण्याचा संकल्प कर्नाटकातील जनतेने केला आहे. सर्वत्र सारखाच उत्साह आहे. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अनेक कार्यक्रम दिले. येडियुरप्पा यांनी अनेक कार्यक्रम दिले आहेत. त्यांनी जात, वर्ण असा भेदभाव न करता सर्वांना योजना दिल्या. आमच्या सरकारने शेतकरी शिक्षण निधी दिला आहे असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.

माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी पूर्वी सांगितले की, खानापूरमध्ये पर्यटनासाठी भरपूर संधी आहे. त्यामुळे त्याचा विकास झाला पाहिजे. तसेच उद्योग सुरू करून कष्टकरी हातांना नोकऱ्या दिल्या पाहिजेत. तिकीट कोणाला मिळाले तरी भाजपच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करा. 8 इच्छुक आहेत. सर्वांनी एकत्र आल्यास २२४ मतदारसंघांपैकी खानापूरमध्ये भाजपचा विजयाचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, जो कोणी भाजपचा बी फॉर्म आणेल तो उमेदवार आहे. त्याला विजयी करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. संपूर्ण जगाने कौतुक केलेले पंतप्रधान मोदी हे आपले नेते आहेत. देशाच्या रक्षणासाठी त्यांनी काम केले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि विद्यमान मुख्यमंत्री बोम्मई हे राज्यात चांगले प्रशासन देत आहेत. काँग्रेसचे लोक डावपेच खेळत येतात. त्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका. राज्यात भाजपची सत्ता येणार हे निश्चित आहे. त्यामुळे खानापूरमध्येही भाजपला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नगरविकास मंत्री बैरती बसवराज, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, अनिल बेनके, महांतेश दोड्डगौडर, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश भाजप प्रवक्ते एम.बी. जिरली, विठ्ठल हलगेकर, डॉ. सोनाली सरनोबत, संजय कुबल, धनश्री सरदेसाई जांबोटकर, मराठा समाज विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार मारुती मुळे आदी नेते व हजारो कार्यकर्त्यांची या जनसंकल्प यात्रेला उपस्थिती होते.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *