
बंगळूर : येडियुरप्पा यांच्या कुटुंबाविरोधात संताप व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा आता भलतेच संतापले आहेत. भाजपचे जेष्ठ नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी त्यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलाविले आणि भेट न देताच माघारी पाठविले.
चन्नपट्टणम येथील रोड शो कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अमित शाह बंगळुरला भाजप नेत्यांच्या भेटीसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी ईश्वरप्पा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता. ईश्वरप्पा यांचा राग शांत न झाल्याने त्यांना दिल्लीत येण्याची सूचना केली होती.
निर्देशानुसार काल सकाळी ईश्वरप्पा दिल्लीला गेले होते. मात्र, अमित शहा यांनी दिवसभर त्यांना भेटच दिली नसल्याने ईश्वरप्पा यांना खाली हात राज्यात परतावे लागले. यामुळे ईश्वरप्पा यांना आणखी एक धक्का बसला आहे. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईश्वरप्पा स्वत:च्या अपराधीपणामुळे अमित शहांना भेटण्यास राजी झाले नाहीत, असे सांगितले जाते.
ईश्वरप्पा यांनी सांगितले की, मी अमित शहा बंगळुरमध्ये असताना त्यांच्याशी बोललो. येडियुरप्पा यांच्या कुटुंबातील मतभेदाबद्दल मी शहा यांना समजावून सांगितले होते आणि अमित शाह यांनी माझा मुलगा कांतेशच्या भविष्याबद्दल विचारले होते, असा खुलासा केला.
यानंतर अमित शहा यांनी दिल्लीला बोलविल्याचे प्रकरण गुपित न ठेवल्याने ते संतापले असल्याचे समजते. ईश्वरप्पा यांनी आपणास दिल्लीला बोलविल्याचे माध्यमांसमोर उघड करुन येडियुरप्पांविरुध्द उघड वक्तव्य केले होते. त्यामुळेच अमित शहा यांनी दिल्लीत त्यांना भेटीची वेळ दिली नाही.
भेटण्याची संधी न मिळाल्याने, राज्यात परतत असताना ईश्वरप्पा पुन्हा भाजप नेत्यांबद्दल बोलले. ईश्वरप्पा म्हणाले, की त्यांनी स्वतः मला दिल्लीला बोलावले आणि आता ते मला भेट घेऊ देत नाहीत, याचा अर्थ मला वाटते की माझ्या स्पर्धेसाठी त्यांची परवानगी आहे.
ईश्वरप्पा यांनी निवडणूक जिंकावी आणि राघवेंद्र यांनी हरावे, असे अमित शहा यांचे मत आहे. याच कारणामुळे ते मला भेटले नाहीत. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या इच्छेनुसार मी निवडणूक लढवणार असल्याचे दिल्लीत सांगून ईश्वरप्पा यांनी आणखी एक चूक केल्याचे विश्लेषण केले जात आहे.
त्यांना न भेटण्याचे कारण सांगून ईश्वरप्पा म्हणाले की, कर्नाटकातील एका कुटुंबाच्या नियंत्रणाखाली हिंदुत्व आणि भाजपसाठी लढणाऱ्यांना तिकीट नाकारण्यासंबंधीच्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरे शहा यांच्याकडे नाहीत. म्हणून शहा मला भेटले नाहीत. शहा यांनी फोन केला तर पुन्हा जाईन. पण मी मैदानातून माघार घेणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र हे त्यांच्या लढतीबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “विजयेंद्रने असेच चालू ठेवले तर मला त्याला वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल”, अशी ईश्वरप्पा यांनी चेतावणी दिली.
काँग्रेसचे उमेदवार गीता शिवराज कुमार या कमकुवत उमेदवार नाहीत या काँग्रेस नेते मधु बंगारप्पा यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत, त्यांनी गीता यांच्यावर वैयक्तिक हल्ले केले नाहीत आणि मला त्यांच्याबद्दल सर्वात जास्त आदर असल्याचे ते म्हणाले.
त्याना आपली बहीण म्हणत ईश्वरप्पा म्हणाले, की मी गीता या राजकीयदृष्ट्या कमकुवत उमेदवार असल्याचा उल्लेख केला होता, परंतु मला माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या समायोजनाच्या राजकारणाचा पर्दाफाश करण्याचा उद्देश होता.
Belgaum Varta Belgaum Varta