Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

खानापूर तालुक्‍यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी

  खानापूर : खानापूर तालुक्‍यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शनिवारी (दि. 22 जुलै) खानापूर तालुक्‍यातील प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. खानापुर तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्टी जाहीर केली …

Read More »

माळ मारुती पोलीस स्टेशनमधील सर्व कर्मचाऱ्यांना दिली डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक लस 

  बेळगाव : रात्रंदिवस जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांचे आरोग्य सुरक्षित रहावे त्यांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे आजार उद्भवू नये याकरिता एंजल फाउंडेशनच्या वतीने डेंग्यू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक देण्यात आली. येथील माळ मारुती पोलीस संघातील सर्व पोलीस कर्मचारी रात्रंदिवस जनतेप्रति आपली सेवा बजावीत असतात तसेच पावसाळ्यात अहोरात्र काम करत असतात. त्यांना कुठेही …

Read More »

दि. जांबोटी मल्टीपर्पज को-ऑप. क्रे. सोसायटी चेअरमनपदी विलासराव बेळगावकर, व्हा. चेअरमनपदी पुंडलिक नाकाडी

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जांबोटी येथील तालुक्यात सर्वात प्रथम सुरू करण्यात आलेल्या दि. जांबोटी मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकताच बिनविरोधात पार पडली. यावेळी संचालक पदी शंकर कुडतुरकर (जांबोटी), यशवंत पाटील (ओलमणी), विद्यानंद बनोशी (खानापूर), पुंडलिक गुरव (गोल्याळी), पांडुरंग नाईक (आमटे), पुंडलिक नाकाडी (बैलूर), विलास कृष्णाजी बेळगावकर …

Read More »

खानापूर शहरासह तालुक्यात धुवांधार पाऊस, रस्त्याची दयनिय अवस्था

  खानापूर : गेल्या चार दिवसापासून खानापूर शहरासह तालुक्यातील अनेक भागात धुवांधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तालुक्यातील नद्या नाल्याना पाणी आले आहे. तालुक्यातील पणजी बेळगाव महामार्गावरील खानापूर शहरालगत रूमेवाडी क्राॅस जवळ रस्त्याची दयनिय अवस्था झाली आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी आले त्यामुळे रस्ता वाहुन गेला आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठे …

Read More »

ममदापूर ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

  अध्यक्षपदी विद्या शिंदे, उपाध्यक्षपदी गजानन कावडकर निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या अमित शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी मतदान पद्धतीने झालेल्या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मारुती कावडकर व भाजप गटाचे बाळासाहेब कदम असे दोन अर्ज दाखल झाले. …

Read More »

4 लाख रू. किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा जप्त!

  बेळगाव : शहरातील सीसीबी पोलिसांनी काल गुरुवारी सदाशिवनगर येथील वीरूपाक्षी रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये धाड टाकून तब्बल 4 लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा व इतर साहित्य जप्त केले असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हसन साहेब बेपारी (वय 22, रा. उज्वलनगर, बेळगाव) आणि राजेश केशव नायक …

Read More »

मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील आरोपीचे घर संतप्त महिलांनी जाळले

  इंफाळ : मणिपूर येथे मे महिन्यात दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट …

Read More »

भारतीय कृषक समाजातर्फे शेतकरी हुतात्मा दिन गांभीर्याने

  बेळगाव : भारतीय कृषक समाज, संयुक्त होराट कर्नाटक आणि यद्येळू कर्नाटका हागू प्रगतीपर संघटनेगळू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरगुंद -नवलगुंद आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचा 43 वा हुतात्मा दिन कार्यक्रम आज सकाळी गांभीर्याने पार पडला. शहरातील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीकेएस तालुका अध्यक्ष संजीव डोंगरगाव हे होते. …

Read More »

‘मोदी चोर’ वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींच्या याचिकेवर ४ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२१ जुलै) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या याचिकेवर नोटीस जारी करत याप्रकरणी ४ ऑगस्टला पुढील सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. राहुल गांधींनी गुजरात उच्च न्यायालयाने ‘मोदी चोर’ या वक्तव्याप्रकरणी दिलेल्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देत निकाल रद्द करण्याची मागणी केली आहे. याच निकालानंतर …

Read More »

कोल्हापूरच्या दूधगंगा नदीच्या पाणीप्रश्नी गावकरी आक्रमक, काठावरील गावांचा कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा

  कोल्हापूर : कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांनी कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा दिला आहे. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सरकारकडून सुळकूड पाणी योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र पाणी द्यायला दूधगंगा नदीकाठाच्या गावांचा विरोध आहेत. इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सुळकूड, कसबा सांगाव, …

Read More »