बंगळूर : दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार दि. 26 किंवा 27 तारखेला होण्याची शक्यता आहे. राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आल्यानंतरदेखील नूतन मंत्र्यांच्या खातेवाटपाला विलंब होत आहे. दुसर्या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार …
Read More »साऊथचे प्रसिद्ध अभिनेते सरथ बाबू यांचे निधन
तेलुगु दिग्गज अभिनेते सरथ बाबू यांचे वयाच्या ७१ वया वर्षी निधन झालं. सरथ बाबू यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. दीर्घकाळ आजारी असल्यामुळे त्यांच्य़ावर हैदराबादमधील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होता. सरथ बाबू यांना रुग्णालयात दाखल करून एक महिन्यांहून अधिक काळ झाला होता. सोमवारच्या सकाळी अचानक त्यांची तब्येत बिघडली …
Read More »मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला, संचारबंदी लागू; सैन्यही परतले
मणिपूर : मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये सोमवारी (दि. 22) पुन्हा हिंसाचार उसळला. यानंतर भारतीय लष्कर आणि सशस्त्र दलांना येथे परत बोलावण्यात आले आहे. राजधानीच्या न्यू चेकॉन भागात स्थानिक बाजारपेठेत जागेवरून मेईतेई आणि कुकी समुदायाच्या सदस्यांमध्ये जोरदार वाद झाला आणि त्यानंतर जाळपोळीच्या घटना घडल्या. तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तत्काळ 144 …
Read More »सिद्धरामय्या सरकारच्या तिजोरीवर किती हजार कोटींचा बोजा?
बंगळुरू : सिद्धरामय्या यांनी मागील आठवड्यात शनिवारी म्हणजेच 20 मे रोजी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी ते दुसऱ्यांदा विराजमान झाले आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसने जनतेला अनेक आश्वासनं दिली होती. सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री होताच ती आश्वासने पूर्ण करण्यास सुरुवात केली आहेत. सरकार सत्तेवर येताच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी …
Read More »दोन हजाराची नोट घेऊनही वोट नाही, नोटेवरच आली बंदी; सोशल मिडियावर जोक्सचा पाऊस
निपाणी (वार्ता) : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयाला कर्नाटकमधील निवडणुकीशी जोडत सोशल मिडियावर मिम्स, जोक्सचा पाऊस पडत आहे. एवढेच नव्हे तर काहींनी ‘शेवटची ही नोट कधी बघितली आठवत नाही’, अशा पोस्ट निपाणी भागात सोशल मिडियावर शेअर करीत अनेक दिवसांपासून …
Read More »शिक्षक मित्रांनी केला समाजातील विद्यार्थ्यांचा गौरव
लवटे, हजारे यांचा उपक्रम : समाज बांधवाकडून कौतुक निपाणी (वार्ता) : रानावनात भटकणाऱ्या धनगर समाज बांधवाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे हा समाज शिक्षणा मध्ये अजूनही प्रगती केलेला नाही. ही बाब गांभीर्याने घेऊन बेनाडी येथील बिरदेव यात्रेच्या निमित्ताने मुख्याध्यापक दत्ता लवटे आणि विज्ञान शिक्षक एस.एस. हजारे या शिक्षक मित्रांनी …
Read More »हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? : मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा
बंगळुरू : कर्नाटक निवडणुकांपूर्वी हिजाब बंदीचा मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं ️हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण ‘हिजाब वाद’ हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या …
Read More »बंगळुरूमधील मुख्यमंत्र्यांसाठीचे ‘झिरो ट्रॅफिक प्रोटोकॉल’ मागे घेण्याचे सिद्धरामय्यांचे आदेश
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर सिद्धरामय्या ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच त्यांनी कामांचा सपाटा लावला आहे. नवनिर्वाचित सिद्धरामय्या सरकारच्या पहिल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये त्यांनी सर्वात आधी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली. त्यानंतर रविवारी (21 मे) रोजी त्यांनी एक विशेष आदेश जारी केला. ज्यामध्ये …
Read More »बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगचा नवा फंडा, बोटावर शाईऐवजी आता लेझर मार्क
नवी दिल्ली : बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणखी एक नवीन तंत्र अवलंबणार आहे. मतदानादरम्यान बोटावर शाईऐवजी आता लेझर चिन्हाचा वापर केला जाणार आहे. हे तंत्रज्ञान आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ‘एआय’ वर आधारित राहणार आहे. तसेच ईव्हीएम मशीमध्ये एक कॅमेरा देखील असणार आहे. जो मतदान करताना मतदारांचे फोटो काढणार आहे. …
Read More »कर्नाटक विजयानंतर काँग्रेसची बुधवारी रणनीतीसाठी बैठक
नवी दिल्ली : कर्नाटकमधील घवघवीत यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून पक्ष नेतृत्वाने भाजपविरोधात थेट लढती होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांवर लक्ष केद्रीत केले आहे.मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये पुढील काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस या राज्यांतील निवडणुकांच्या रणनीतीबाबत विचार करत असून २४ मे रोजी संबंधित राज्यांतील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta