सोलापूर : सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल सहा वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सांगोला-मिरज मार्गावर जुनोनी …
Read More »हुन्नरगी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उत्तम पाटील गटाचा करिष्मा
वृषभ चौगुले ९७ मतांनी विजयी : कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील चौगुले यांच्या अकाली निधनामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर शुक्रवारी (ता. २८) पोटनिवडणूक झाली होती. त्याची मतमोजणी सोमवारी (ता.३१) येथील तहसीलदार कार्यालयात झाली. यावेळी भाजप व काँग्रेस उमेदवारांना पराभूत करत उत्तम पाटील गटाचे उमेदवार वृषभ …
Read More »सौंदलगा येथील शेतकऱ्याला घोणस आळीचा दंश
सौंदलगा (वार्ताहर) : सौंदलगा येथील शेतकरी नामदेव साळुंखे यांना घोणस आळीने दंश केल्याने अस्वस्थ झाल्यामुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रनंतर आता सीमाभागामध्ये या महाभयंकर घोणस अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दिवसापूर्वी कुर्ली व मत्तीवडे येथे उसाच्या पानावर घोणस अळी आढळून आल्या होत्या. त्यानंतर दिनांक …
Read More »काळा दिन गांभीर्याने पाळा : माजी आमदार दिगंबरराव पाटील
खानापूर : काळ्या दिनी उद्या दि. 1 नोव्हेंबर रोजी खानापूर तालुका म. ए. समितीतर्फे शिवस्मारकात आयोजित निषेध सभेला मराठी भाषिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून 1 नोव्हेंबर हा सुतक दिन म्हणून पाळावा, असे आवाहन माजी आमदार दिगंबरराव पाटील यांनी केले आहे. 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली व बहुभाषिक मराठी …
Read More »कोगनोळी महामार्गावर शिवसेनेचा मोर्चा
रास्ता रोको करत वाहतूक रोखून धरली कोगनोळी : 1 नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा “राज्योत्सव” म्हणून साजरा केला जातो तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याचदिवशी “काळा” दिन म्हणून साजरा करतात. मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी दूधगंगा पुलावर कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीने …
Read More »मणतुर्गा रेल्वे गेट जवळील कमान काढा : शेतकऱ्यांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान उभारण्यात आली आहे. सध्या रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात आल्याने मणतुर्गा रेल्वे गेटवर रुंदीकरणाचे काम चालू आहे. रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे. येथील कमानीचा या भागातील उसाच्या ट्रकना ये-जा करताना त्रास होत. कमानीतून उसाच्या ट्रक जात नाहीत त्यामुळे कमान काढुन या …
Read More »खानापूरमध्ये रयत संघटनेचा यल्गार
नुकसान भरपाईसह ऊस दर निश्चित करा : तहसीलदारांना जैन यांना निवेदन निपाणी (वार्ता) : अतिवृष्टी आणि महापूर काळात अनेक घरे पडली आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही. यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी प्रतिटन ५५०० रुपये दर द्यावा या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक …
Read More »कोगनोळीजवळ पोलीस छावणीचे स्वरूप; शिवसैनिकांना प्रवेश बंदी
कोगनोळी : एक नोव्हेंबर हा कर्नाटक राज्याचा राज्योत्सव म्हणून साजरा केला जातो. तर बेळगाव जिल्ह्यातील मराठी भाषिक याच दिवशी काळा दिन म्हणून साजरा करतात. यासाठी विविध मोर्चे व निदर्शने सायकल रॅली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला व मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. …
Read More »ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव सोहळा डिसेंबरमध्ये
बेळगाव : सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, कामगार नेते माजी महापौर ऍड. नागेश सातेरी यांचा अमृतमहोत्सव येत्या डिसेंबरमध्ये साजरा करण्यात येणार आहे. विविध संघटनांच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अंनिसचे कार्याध्यक्ष भाई अशोक देशपांडे अध्यक्ष स्थानी होते. प्रा. आनंद मेणसे यांनी प्रारंभी प्रास्ताविक करताना सातेरी यांनी …
Read More »खानापूरात अनैतिक संबंधातून खून
खानापूर : खानापूरात अनैतिक संबंधातून खून झाल्याने खानापूर शहर हादरले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, खानापूर येथील आश्रय कॉलनीत रात्री 12 च्या सुमारास मारुती गणराज जाधव (वय 42) याचा प्रशांत दत्ता नार्वेकर याने धारदार चाकूने वार करून खून केला आहे. मारुती हा रात्री जेवण करून आपल्या घरासमोर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta