Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

भारताचा इंग्लंडवर दहा गडी राखून दणदणीत विजय

केनिंग्टन : भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला. हा सामना भारताने १० गडी राखून जिंकला. जसप्रीत बुमराहचे सहा बळी आणि कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ही आजच्या सामन्याची वैशिष्ट्ये ठरली. जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय संघाने इंग्लंडला …

Read More »

मदत, बचावकार्यासाठी निधीची कमतरता नाही

मुख्यमंत्री बोम्मई, निगम व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बदलणार बंगळूर : राज्यातील अनेक भाग पुराच्या तडाख्यात असताना या संकटाच्या वेळी कर्नाटक सरकार लोकांच्या पाठीशी आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सांगितले. मदत आणि बचावकार्यासाठी निधीची कमतरता नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, राज्यातील निगम व महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना बदलून नवीन लोकांना संधी देण्यात येणार …

Read More »

वडिलांच्या वाढदिवसादिवशी मुलाची आत्महत्या

  खानापूर : वडिलांच्या वाढदिवसा दिवशीच मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथे घडली. याबाबत समजलेली सविस्तर माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी येथील आंबेडकर गल्लीतील प्रथमेश राजू कोळी (17) याने आपल्या वडिलांकडे नवीन मोबाईलची मागणी केली. पण वडिलांनी नवीन मोबाईल लवकरच घेऊ सध्या जुना …

Read More »

लक्ष्मीताई फाउंडेशनतर्फे पॉवरमनना रेनकोट वितरण

बेळगाव : पावसाळ्याच्या दिवसात पॉवरमनकडून मिळणारी सेवा हि अत्यंत महत्वपूर्ण असते. जीव धोक्यात घालून जनतेला सेवा पुरविणाऱ्या पॉवरमनसाठी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने रेनकोटचे वितरण करण्यात आले. बेळगाव तालुक्यातील सुलगा येथील लावण्य हॉल येथे आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात बेळगावच्या केईबी विभागातील पॉवरमनना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते रेनकोट वितरित करण्यात आले. यासंदर्भात …

Read More »

आरपीडी महाविद्यालयात २० रोजी राष्ट्रीय हिंदी चर्चासत्र

बेळगाव : ‘आजादी का अमृतमहोत्सव’ अंतर्गत केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा यांच्या सहकार्याने राणी पार्वती देवी महाविद्यालय, बेळगाव तसेच कर्नाटक राज्य विश्वविद्यालय कॉलेज हिंदी प्राध्यापक संघ बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वातंत्र्योत्तर हिंदी साहित्य में राष्ट्रीयता की भावना” या विषयावर एकदिवशीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. २० जुलै रोजी आरपीडी महाविद्यालयाच्या …

Read More »

म. ए. समितीच्या मागणीची राष्ट्रपती कार्यालयाकडून दखल

  बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार सीमाभागातील मराठी भाषिकांना सरकारी परिपत्रके मराठीतून मिळावीत या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने 1 जून रोजी निवेदनाद्वारे जिल्ह्यधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आली होती. तसेच 20 दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठी भाषिकांनाचा भव्य मोर्चा काढण्याचा इशारा देखील देण्यात आला होता आणि या मागणीची एक …

Read More »

पिरनवाडी येथे उद्या “बांदल सेना शौर्य दिवस”

बेळगाव : पिरनवाडी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे 13 जुलै 2022 रोजी सकाळी 7 वाजता या भागातील समस्त शिवभक्तांतर्फे “पावनखिंडचा रणसंग्राम” अर्थात “बांदल सेना शौर्य दिवस” मानवंदना देऊन गांभीर्याने पाळण्यात येणार आहे. पावनखिंडीतल्या रणसंग्रामात अतुलनीय शौर्य गाजविलेल्या पराक्रमी वीर शिवा काशिद आणि बाजीप्रभूंना आम्ही आठवण करतो, पण त्याच रणसंग्रामात अतुलनीय …

Read More »

प्रा. हरी नरके यांना ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’

  कोल्हापूर : ज्येष्ठ लेखक व विचारवंत प्रा. हरी नरके यांना २०२२ सालचा ‘कॉ. गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. गोपाळ गुरु, उद्धव कांबळे यांच्या निवड समितीने हे पुरस्कार जाहीर केले आहेत. या प्रबोधन पुरस्कार समितीचे अध्यक्ष माजी संपादक उत्तम कांबळे व …

Read More »

पूरग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्‍या पूरग्रस्त शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या लाभातून वगळले होते. परंतु, या शेतकर्‍यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलासा दिला. या शेतकर्‍यांना योजनेतून वगळले जाणार नाही, याबाबत शासन निर्णय त्वरित काढण्याचे निर्देश देत असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयातून केले आहे. खासदार धैर्यशील माने आणि प्रकाश आबिटकर यांनी ही …

Read More »

चातुर्मास निमित्त 14 रोजी बोरगावात कलश स्थापना

  जैन मंदिर अध्यक्ष उत्तम पाटील : 41 वा चातुर्मास वर्षायोग निपाणी (वार्ता) : गणीनी प्रमुख आर्यिकारत्न श्री 105 मुक्तीलक्ष्मी माताजी व आर्यिकारत्न 105 निर्वाण लक्ष्मी माताजींचा 41 वा चातुर्मास वर्षायोग बोरगाव येथे होत आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता.14) कलश स्थापना कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे …

Read More »