Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे आज परिपत्रके मराठीतुन मिळावीत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी म्हणाले की, सीमाभागात 27 जून रोजी होणाऱ्या मोर्चासंबंधी जनजागृती सुरू आहे. प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा अंतर्भाव हवा सरकारी कागदपत्रे मराठीतूनच मिळावीत या मागणीसाठी समिती …

Read More »

म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील 9 जणांचा संशयास्पद मृत्यू

मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु सर्वांचा मृत्यू हा विषबाधेने झाला की त्यांनी आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. म्हैसाळ येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरा पर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे दवाखान्यातील …

Read More »

देवालाही चुना? श्रीराम मंदिराच्या दानातील 22 कोटींचे चेक बाउन्स

नवी दिल्ली : किमान लोकांनी देवालाही तरी फसवू नये असं म्हणतात. मात्र, रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला याच्या उलट अनुभव आला आहे. ट्रस्टच्यावतीने चालवण्यात आलेल्या समर्पण अभियानात आतापर्यंत सुमारे 5457.94 कोटींचा निधी जमवला आहे. मात्र, दान म्हणून आलेल्या रक्कमेतील जवळपास 22 कोटींच्या रक्कमेचे चेक बाउन्स झाले आहेत. त्याबाबतचा एक वेगळा अहवाल …

Read More »

विधानपरिषद निवडणूक; मतदानाच्या परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांची सर्वोच्च न्यायालयात धाव

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती फेटाळण्यात आली. त्यांच्यासोबतच १०० कोटींच्या गैरव्यवहारात नाव आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील मतदानासाठी कोर्टाचे उंबरठे झिजवत आहेत. राज्यसभेला मतदान …

Read More »

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची मोठी कामगिरी, 24 तासांत 7 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू : जम्मू आणि काश्मिरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या ऑपरेशन ऑलआउट अंतर्गत रविवारी रात्री उशिरापर्यंत इन्काउंटरमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. सुरक्षा दलाकडून सध्या परिसरात शोधकार्य सुरु आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशिरापर्यंत चकमक झाली. यामध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. रविवारी कुपवाडामध्ये जवानांनी दोन …

Read More »

युवा सेनेच्यावतीने शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा

बेळगाव : शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त युवा सेना सीमाभाग बेळगांवची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी युवासैनिक व कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन केले. नाथ पै चौक, शहापूर येथील नेताजी भवन येथे शिवसेना युवा सेना बेळगावची बैठक काल रविवारी पार पडली. सदर बैठकीस …

Read More »

27 जूनच्या महामोर्चासंदर्भात खानापूर तालुका समितीची मौजे नागूर्डा येथे जागृती बैठक

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने नागूर्डा येथे 27 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चाची पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली, यावेळी गावातील विठ्ठल रुक्माई मंदिरमध्ये बैठक झाली. या बैठकीचे अध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई होते, बैठकीचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी दैनंदिन जीवनामध्ये कशाप्रकारे सरकारी कार्यालयांमध्ये कन्नड …

Read More »

बंगळुरुमध्ये पावसाचा विजय, मालिका बरोबरीत

बंगळुरू : पावसामुळे निर्णायक सामना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली आहे. बंगळुरु येथे सकाळपासूनच पावसाचे वातावरण होते. सामन्यापूर्वी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे नाणेफेक झाली. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार केशव महाराज याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय …

Read More »

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान, काँग्रेस-भाजपमध्ये खरी लढत, कोण मारणार बाजी?

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास …

Read More »

अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांचे उपोषण

खानापूर : अग्निपथ विरोधात खानापूरच्या आमदार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी आज रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत शिवस्मारक चौक खानापूर येथे लाक्षणिक उपोषण केले. केंद्र सरकारच्या अग्निपथ धोरणाच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला रयत संघटनेचे श्री. बसनगौडा पाटील व त्यांच्या साथीदारांनी आपला पाठींबा दर्शविला. तसेच कन्नड …

Read More »