बेळगाव : आचारसंहिता लागू झाली असली तरी गुरुवंदनाचे प्रचार मोहीम राबवण्यात कोणती अडचण नाही. आचारसंहितेचे पालन करून “गुरुवंदना” कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नसल्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती किरण जाधव यांच्याकडून घेतली. त्याचबरोबर कार्यक्रमासंबंधी जागृती करणारे फलक आहेत त्यावर राजकीय नेत्याच्या छबी असणारे फलक हटविण्याची सूचना केली. “गुरुवंदना” कार्यक्रमाचे फलक लावण्यात कोणती अडचण नसल्याचे नमूद केले. यावेळी सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव, अनंत लाड, सुनील जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते.
Check Also
काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक
Spread the love बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …