Thursday , March 5 2026
Breaking News

महाशिवरात्री निमित्त ब्रह्मा कुमारींची शहरात शांती सद्भावना यात्रा

Spread the love

 

बेळगाव : शहरातील प्रजापिता ईश्वरी विद्यापीठाच्या वतीने महाशिवरात्रीचा पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवरून ‘शिव संदेश’ शांती सद्भावना यात्रा काढण्यात आली.
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बेळगाव शाखाप्रमुख अंबिका दीदी यांनी गुरुवारी शहरातील महांतेश नगर येथील प्रजापीता ईश्वरीय विद्यापीठात शांती सद्भावना वाहन चालवले.

यावेळी बोलताना दादी अंबिका म्हणाल्या, हिंदू जीवनशैली आणि संस्कृतीत महाशिवरात्री सणाला विशेष स्थान आहे. महाशिवरात्रीचा सर्वात महत्त्वाचा विधी म्हणजे उपवास करून परमपित्या शिवाचे स्मरण करत राहणे, शिवाला बिल्वपत्र अर्पण करणे आणि अहोरात्र जागरण करणे आणि चांगला विचारांनी सदैव प्रेरित राहणे.
सद्भावना यात्रेत शेकडो ब्रह्मकुमारी आणि ब्रह्मकुमारी ब्रह्माकुमारांनी झेंडे घेऊन शहरातील काकतीवेस रोड, गणपती गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, संभाजी चौक, चन्नम्मा सर्कल मार्गे मिरवणूक काढली. मिरवणूक शांतता आणि सद्भावनेचा नारा देण्यात आला.
ब्रह्मा कुमारी दादी मीनाक्षी, दादी सुलोचना, दादी बी. के. रूपा, दादी बी. के. सरोजा, दादी बी. के. शोभा, दादी महादेवी, दादी पार्वती, बंधू महंतेश आणि ब्रह्मकुमार बंधू श्रीकांत या रॅलीत सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *