Thursday , March 5 2026
Breaking News

तीन वर्षीय बालिकेची हत्या; आजी-आजोबांचा आरोप

Spread the love

 

बेळगाव : काही वर्षांपूर्वी आईचे निधन झाले. त्यानंतर सावत्र आई आणि वडिलांच्या सान्निध्यात वाढलेल्या मुलीचेही निधन झाले आहे. मात्र हा नैसर्गिक मृत्यू नसून खून असल्याचा आरोप मृत मुलीच्या आजी-आजोबांनी केला आहे.
परकन्नट्टी येथील रायण्णा हंपण्णावर यांचा विवाह कडोली येथील भारती हंपण्णावर या तरुणीशी पाच वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना एक मुलगीही झाली. मात्र काही वर्षांपूर्वी भारती हंपण्णावर यांचे निधन झाले. यानंतर रायण्णाने दुसरे लग्न केले. पण पहिल्या पत्नीच्या पोटी जन्मलेल्या मुलीचे पालनपोषण त्याच्या दुसऱ्या पत्नीने केले. ते महाराष्ट्रातील नागपूर येथे कार्यरत असले तरी बेळगाव शहरातील कंग्राळी के. एच. मध्ये घर बांधले आहे. मात्र आज समृध्दी हंपण्णावर (३) या त्यांच्या मुलीचा आजारपणाने मृत्यू झाला. समृद्धीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मृत भारती हंपण्णावार यांच्या पालकांना मिळाली. तातडीने कुटुंबीय कडोलीहून बेळगाव जिल्हा रुग्णालयात आले असता मुलाने अखेरचा श्वास घेतल्याचे पाहिले. रायण्णा हंपण्णावर, याने पूर्वी माझ्या मुलीची हत्या केली होती, त्याला आता दुसरी पत्नी आहे आणि त्याने माझ्या नातीलाही मारले आहे. समृद्धीची आजी रेणुका हंपण्णावर यांनी रायण्णा हंपण्णावर आणि त्याच्या कुटुंबियांना फाशी द्यावी, अशी मागणी केली.

याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपासानंतरच सत्य बाहेर येईल.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावात मनपाचे ‘ऑपरेशन लायसन्स’; नियम धाब्यावर बसवणाऱ्या बड्या शोरूम्सना दणका

Spread the love  बेळगाव : बेळगाव महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानंतर आता शहरभर आरोग्य निरीक्षकांचे पथक मैदानात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *