बेळगाव : हलगा-मच्छे बायपास प्रकरणी न्यायालयाने शेतकऱ्यांचा एक दावा मंगळवारी (दि. ३) फेटाळला. त्यामुळे शेतकऱ्यांना धक्का बसला असून, या निकालाविरोधात महिनाभरात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासमोरील एक अडथळा दूर झाल्यामुळे बायपास कामाचा वेग वाढणार आहे.
हलगा-मच्छे बायपासचा झिरो पॉईंट निश्चित झाल्याशिवाय या रस्त्यावरून कोणतीही रहदारी करण्यात येऊ नये, रस्ता वापरण्यात येऊ नये, असा दावा शेतकऱ्यांनी सातवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयात दाखल केला होता. या दाव्यावर आज अंतिम सुनावणी झाली. त्यामध्ये न्यायालयाने शेतकऱ्यांचा हा दावा फेटाळून लावला. दावा फेटाळताना कोणती कारणे दिली आहेत, याबाबत अद्याप सविस्तर माहिती वकिलांना मिळालेली नाही; पण महिनाभराच्या आत या निकालाविरोधात वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाद मागण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.
Belgaum Varta Belgaum Varta