Tuesday , December 16 2025
Breaking News

बेळगावात शिवकालीन शस्त्रे आणि भारताच्या पहिल्या नौदलंच्या वस्तूंचे प्रदर्शन

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रे आणि भारतातील पहिल्या नौदलाच्या उपकरणांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे बेळगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रास्त्रांचे आणि भारताच्या पहिल्या नौदलातील वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले आहे. आज शहरातील गोवावेस सर्कल येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

ही मिरवणूक बेळगावातील इंद्रप्रस्थनगर येथील मराठा मंदिर कार्यालयात पोहोचली. येथे ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, उद्योगपती शिरीष गोगटे, मिलिंद भातकांडे, रोटरी क्लबचे अध्यक्ष शरद पै, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रम सिंह मोहिते, इसाजी कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक, अशोक नाईक, नीलेश पाटील, भूषण मोहिरे, रोटरी गव्हर्नर अनंत नाडागौडा, आनंद कुलकर्णी, माजी राज्यपाल व्यंकटेश देशपांडे आणि इतर मान्यवरांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाक्षरी असलेली पत्रे, मोडी लिपी, त्या काळातील स्टॅम्प पेपर, नाणी, विविध प्रकारची शस्त्रे, शिवाजी महाराजांच्या युद्धातील घटना दर्शविणारी रांगोळी शिवकालीन इतिहास सांगते. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी भारतीय किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी एक शक्तिशाली भारतीय नौदल निर्माण केले. शत्रूंशी लढण्यासाठी त्यांनी शक्तिशाली नौदल आणि युद्धनौका तयार केल्या होत्या. या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिकृती आणि माहिती दिली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले.

गेल्या २५ वर्षांपासून इतिहास सांगण्यासाठी विविध ठिकाणी शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करणारे चिंचवड, पुणे येथील संतोष मुरलीधर चंदने यांनी याबद्दल आपली मराठीला अधिक माहिती दिली. फिरत्या शस्त्रागाराच्या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्रांचे प्रदर्शन गेल्या २५ वर्षांपासून आयोजित करून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रदर्शनात डॉक्टर मनीषा जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध प्रसंग रांगोळी कलाकृतीतून रेखाटले होते. साई आर्ट्सच्या माध्यमातून विविध चित्रे रेखाटण्यासाठी सुमारे २४ तास कठोर परिश्रम करावे लागले असे त्यांनी सांगितले.।तसेच रोटरी क्लब बेळगाव साउथच्या प्रमुखांनी याबद्दल माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापन करण्यात आणि शत्रूंचा पराभव करण्यात आणि राजा राम महाराजांच्या काळापर्यंत देशाचे रक्षण करण्यात कर्नाटकच्या राजांचे सहकार्य अमूल्य होते. महाराजांचा इतिहास आणि कर्नाटक प्रदेश वेगळा करता येणार नाही. हा प्रदर्शन पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्योती सेंट्रल स्कूलमध्ये विशेष ‘करिअर मार्गदर्शन’ सत्राचे आयोजन

Spread the love  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *