
बेळगाव : बसवण्णा हे एक महान पुरुष होते ज्यांनी जात, रंग आणि वर्ग भेद दूर करून समान समाज निर्माण केला. बसवण्णाच्या मार्गावर चालल्यास जीवनाचे सार्थक होईल, असे प्रतिपादन महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवारी (३० एप्रिल) गोवावेस येथील श्री बसवेश्वर चौक येथे आयोजित श्री जगज्योती बसवेश्वर जयंती महोत्सवाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.


यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या, आपण बसवण्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले पाहिजे. जर आपण बसवण्णांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण केले तर आपल्या जीवनाला चांगली दिशा मिळेल. बसवाण्णांनी आपले जीवन सामाजिक सुधारणांसाठी समर्पित केले होते आणि त्यांच्या संघर्षामुळेच आपण आनंदी जीवन जगू शकलो.
आपण धर्मग्रंथ समजून घेतले पाहिजेत आणि त्यांचे सार आणि तत्त्वे आपल्या जीवनात लागू केली पाहिजेत. आपण सर्वांनी समाजातील वाईट अनिष्ट प्रथा काढून टाकण्यासाठी आणि चुका सुधारण्यासाठी तसेच चांगले जीवन जगण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत असेही हेब्बाळकर यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे वक्ते लेखक डॉ. बसवराज जगजंपी म्हणाले, बसवेश्वर हे महान संत होते. ‘ज्ञानाच्या सामर्थ्याने आपण अज्ञानाच्या वाईट गोष्टींवर मात करू शकतो.’ असा संदेश त्यांनी सातत्याने दिला.बसवेश्वरांचे विचार फक्त एका जातीपुरते किंवा एका राज्यापुरते मर्यादित नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला बेळगावचे महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा, अतिरिक्त जिल्हा आयुक्त विजयकुमार होनकेरी, महानगरपालिकेचे उपायुक्त उदयकुमार तळवार, कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, रत्नप्रभा बेलवाड, बसवराज रोट्टी, इराण्णा दयानवरा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी विलास जोशी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह समाजातील प्रमुख व्यक्तींनी बसवेश्वर उद्यानातील बसवेश्वरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.
Belgaum Varta Belgaum Varta