Saturday , September 21 2024
Breaking News

संकेश्वर

भाजपाचे महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार : मंत्री उमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : विधानपरिषद निवडणुकीत बेळगांव जिल्ह्यात भाजपाचे उमेदवार महांतेश कवटगीमठ पहिल्या प्राधान्य मतांनी विजयी होणार असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी संकेश्वरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, महांतेश कवटगीमठ यांना जिल्ह्यात सर्वत्र चांगले मतदान झाले आहे. किमान 1500 मताधिक्याने त्यांचा विजयी निश्चित आहे. …

Read More »

शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील

राजू पोवार : मंगावते माळमध्ये स्वयंप्रेरणेने शाखेचे उद्घाटन निपाणी : केंद्र आणि राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे शेतकरी वर्ग दिवसेंदिवस अडचणीत सापडला आहे. शिवाय जाचक कायदे व इतर नियमावलीमुळे शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना नेहमीच रस्त्यावर उतरण्यास तयार आहे. शेतकर्‍यांना कसलीही अडचण असेल तर आपण कधीही …

Read More »

लाळखुराक आजाराने कुर्लीतील तीन जनावरे दगावली

लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण …

Read More »

मतदान केंद्रात मोबाईल बंदी करावी : ऐवान डिसोझा यांची मागणी

चिक्कोडी : विधानसभा निवडणुका नि:पक्षपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्यातील प्रत्येक बूथवरील मतदारांवर मोबाईल बंदी घालावी, असे आवाहन काँग्रेसचे निवडणूक आयुक्त ऐवान डिसोझा यांनी केले. चिक्कोडी जिल्हा काँग्रेस कार्यालयात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. मतदारांकडे मोबाईल असल्याने ते संबंधित उमेदवाराकडे जाऊन बूथमध्ये मतदान केलेला फोटो किंवा व्हिडिओ …

Read More »

काँग्रेसलाच सदस्यांचा कौल : माणिकराव ठाकरे

संकेश्वर (प्रतिनिधी) : बेळगांव विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत, पालिका सदस्यांचा काँग्रेसला कौल असल्याचे चित्र स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. ते संकेश्वर एसडीव्हीएस सभाभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बेळगांव विधानपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून बोलत होते. ते पुढे …

Read More »

दत्त कारखान्यातर्फे बोरगांवमध्ये ’शुगर बीट’ शेती!

कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर लागवड : एफआरपीप्रमाणे देणार दर निपाणी : अतिवृष्टी आणि महापुराने अस्वस्थ झालेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिरोळच्या दत्त शेतकरी सहकारी कारखान्याने शुगर बीट लागवडीचा नवा पॅटर्न आणला आहे. बोरगाव कार्यक्षेत्रात सुमारे 5 एकरहून अधिक तर कारखाना कार्यक्षेत्रात 50 एकरवर शुगर बीटची लागवड करण्यात आलेली आहे. केवळ चर्चाच …

Read More »

निपाणीत ‘नेसा’तर्फे मॅरेथॉन स्पर्धा

1630 स्पर्धकांचा सहभाग : स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी : मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही वयामध्ये कोणत्याही गोष्टीचा केव्हाही व कोठेही कसाही अस्वाद घेऊ शकतो. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करून अनेक गरुड भरार्‍या घेऊ शकतो. पण हे सर्व करत असताना त्याचे आरोग्य जर त्याला साथ देत नसेल तर हे सर्व हवेत …

Read More »

लग्नसराईच्या हंगामामुळे फुलांच्या मागणीत वाढ

फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली …

Read More »

स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसायात प्राधान्य द्यावे

राजू पोवार: जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी निपाणी : सरकारने अनेक ठिकाणच्या भुखंडावर परप्रांतीयांना जागा देवून आणि वीज व पाणीपुरवठा सोयीसवलती कमी दर देवून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकान, हार्डवेअर, सॅनिटरी, मोबाईल शॉप, बांधकाम व्यावसायिक, फळे व भाजीपाला, फर्निचर, मिठाई, हॉटेल, कापड उद्योग अशा सर्वच ठिकाणी परप्रांतीयांचे जाळे निर्माण …

Read More »

रावसाहेब पाटील यांच्यामुळे द. भा. जैन सभेचे कार्य तळागळापर्यंत

आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील …

Read More »