Sunday , September 8 2024
Breaking News

महाराष्ट्र

वसंत मोरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार!

  मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, त्यांनी पुण्यातील आपल्या सहकाऱ्यांसमवेत उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत, माजी खासदार विनायक राऊत हेही यावेळी मातोश्रीवर होते. वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या …

Read More »

पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे निधन

  पुणे : गोवामुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, सीमालढा याचबरोबर मुंबईतील श्रमजीवी जनतेच्या लढ्यात अग्रभागी राहून लढलेल्या नेत्या पद्मश्री कॉ. प्रेमा पुरव यांचे मंगळवार दि. २ जुलै रोजी पहाटे निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. मेधा सामंत पुरव, विशाखा पुरंदरे व माधवी कोलंकारी या तीन कन्या, जावई, …

Read More »

अलमट्टी धरणात १५ टीएमसी पाणी साठ्यात वाढ

  सांगली : मान्सून हंगामातील पहिल्या टप्प्यात कोयना, चांदोली धरणापेक्षा अलमट्टी धरणात पाणीसाठा जलदगतीने वाढत असून गेल्या पंधरा दिवसात अलमट्टी मध्ये १५.३६ टीएमसी, तर कोयनेमध्ये ५ आणि चांदोलीमध्ये १.३४ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. गेल्या दोन दिवसापासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढले असून गेल्या २४ तासात कोयना येथे १०२, …

Read More »

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. विधानभवनातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री …

Read More »

महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

  मुंबई : महाराष्ट्र राज्यात ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विधानसभेत बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. याबाबतची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली होती. यावर बोलताना मुख्यमंत्री …

Read More »

शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे : पन्नालाल सुराणा

  यंदाचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार पन्नालाल सुराणा यांना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रदान कोल्हापूर : देशाची लोकशाही बळकट व्हायला हवी. लोकशाही टिकवून प्रत्येक घटकाचा विकास साधणे हे देशासमोरील मोठे आव्हान असल्याचे सांगून शाहू महाराजांच्या विचारांनी देशाची वाटचाल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार, समाजसेवक …

Read More »

‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा!

  ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव ‘एम्.आय.एम्.’चे भाग्यनगरचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लोकसभेत ‘लोकसभा सदस्यत्वा’ची शपथ घेतांना ‘जय भीम, जय मीम’, ‘अल्लाहू अकबर’ या घोषणासमवेत ‘जय फिलीस्तिन (पॅलेस्टाईन) अशीही घोषणा दिली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्याही सदस्याने अन्य कोणत्याही देशाला समर्थन देणे अवैध असून त्यानुसार त्यांचे सदस्यत्व …

Read More »

उद्या कोल्हापूर बंद! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्यावेळी काळे झेंडे दाखवणार

  कोल्हापूर : कोल्हापूर शास्वत विकास परिषदेसाठी उद्या मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आणि पूर्वीच्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी हद्दवाढ आणि सर्किट बॅचच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येणार असलेल्या दिवशीच म्हणजे मंगळवारी कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय रविवारी हद्दवाढ कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी …

Read More »

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली

  डॉक्टरांनी लावलं सलाईन; हृदयाची होणार तपासणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. त्यांना पुन्हा सलाईन लावण्यात आल्याचे समजले आहे. त्यांच्या हृदयाची तपासणी देखील करण्यात येणार आहे. टूडी इको, इसीजीसह अत्याधुनिक मशीनद्वारे त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा दिवसांपासून …

Read More »

तिलारी घाट 31 ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद

  कोल्हापूर (जिमाका) : चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील बऱ्याच ठिकाणी रोडच्या बाजुचे संरक्षक कठडे जीर्ण व नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे घाटामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाटामधुन एस.टी. वाहतुक सुध्दा सुरु आहे त्यामुळे एस.टी. बसचा एखादा उपघात होवून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ …

Read More »