मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर : बोरगावमध्ये संवाद बैठक निपाणी (वार्ता) : कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे १५ मे च्या दरम्यान द. भा. जैन सभेचे शंभरावे अधिवेशन भव्य स्वरुपात सांगलीत होणार आहे. त्यासाठी लाखाच्या संख्येत जैन समुदाय उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मंत्री आदित्य …
Read More »हंचिनाळ सरकारी मराठी मुलांच्या शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
तिसऱ्यांदा मिळाला शाळेला एल आय सी चा सन्मान. हंचिनाळ : येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे निपाणी शाखेचे शाखाधिकारी संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी. हंचिनाळ ग्रामपंचायतीचे चेअरमन बबन हवलदार. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास अधिकारी शेखर …
Read More »ममदापूरमध्ये रंगला माऊली आश्वाचा रिंगण सोहळा!
मान्यवरांची उपस्थिती : आठवडाभराच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता निपाणी : टाळ-मृदंगांचा गजर, विठू माऊलीचा जयघोष आणि निपाणी परिसरातील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ममदापूर (के. एल.) येथे मंगळवारी (ता.१५) माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला. त्यानंतर महाप्रसादाचा वाटप आणि आठवडाभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रारंभी युवानेते उत्तम पाटील आणि ममदापूर …
Read More »तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे : मंत्री उमेश कत्ती
संकेश्वर (महंमद मोमीन) : तुम्हा सर्वांचं प्रेम-आशीर्वाद माझ्यावर सदाकाल राहुदे, हीच माझी शक्ती असल्याचे राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी सांगितले. आज हुक्केरी विश्वनाथ सभाभवन येथे आयोजित आपल्या वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते. हुक्केरी हिरेमठचे परमपूज्य श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्री मल्लिकार्जुन स्वामीजी, तालुक्यातील अकरा श्रींच्या …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांने जोपासला तलाव स्वच्छतेचा वसा!
सलग चौथ्या वर्षी उपक्रम : तलावाच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ निपाणी (वार्ता) : येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलाव परिसरात पावसाळ्यातील पाणी ओढ्यामार्गे तलावात येते. पण काही वर्षांपासून पाणी येणाऱ्या मार्गावर काटेरी झाडांसह टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात पडल्या होत्या. त्यामुळे पावसाचे ओढ्यामार्गे तलावात पाणी येण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात …
Read More »नरसिंगपूरनजिक इनोव्हाची पाठीमागून कंटेनरला धडक; आई-मुलगी जागीच ठार
डाॅ. सचिन मुरगुडेंची स्थिती चिंताजनक संकेश्वर (महमद मोमीन) : यमकनमर्डी पोलिस ठाणा हद्दीतील नरसिंगपूर बेनकनहोळी राष्ट्रीय महामार्गावर सायंकाळी ४.३० वाजता रस्त्या शेजारी थांबलेल्या कंटेनर ट्रकला पाठीमागून इनोव्हा कारने जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात संकेश्वर डॉ. मुरगुडे कुटुंबातील माय-लेक जागीच ठार झाल्या आहेत. अपघातात संकेश्वरचे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन मुरगुडे गंभीररित्या …
Read More »मंत्री उमेश कत्ती यांना दिर्घायुष्य लाभो : श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी
संकेश्वर (प्रतिनिधी) : हुक्केरी मतक्षेत्राचे आमदार, राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांना दिर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून हुक्केरी मतक्षेत्राचा सर्वांगिण विकास होवो असे निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. मंत्री उमेश कत्ती यांचा वाढदिवस सोहळ्यानिमित्त आज मंत्रीमहोदयांच्या बेल्लद बागेवाडी येथील निवासस्थानी निडसोसी मठाचे परमपूज्य. पंचम श्री …
Read More »अखंड भारत भाजपमय होईल : शिवाजी पाटील
संकेश्वर (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे लक्ष अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करुन देशाचा सर्वांगीण विकास साधणे आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत चार राज्यांत भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. येत्या कांही वर्षांत अखंड भारतात भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे काम मोदीजी निश्चितपणे करतील असे भाजपाचे पश्चिम …
Read More »यशवंतरावांनी सीमाभागात दिलेले योगदान महत्त्वाचे!
प्रा. डॉ. अच्युत माने : यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाणचे आदर्श आणि दृष्टे राजकारणी होते. त्यांनी प्रामाणिकपणे देशसेवा करत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागात दिलेले योगदान मोलाचे आहे. त्यांच्या कार्याचा राज्यकर्त्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे. सीमाभागातील मराठी बांधवासाठी त्यांनी दिलेल्या शैक्षणिक योजनांमुळे या भागातील अनेक पिढ्यांचा …
Read More »चिमुकल्यांनी केले पर्यावरण प्रदूषणाचे प्रबोधन
प्लास्टिक टाळा देश वाचवा : ’अंकुरम’ शाळेचा उपक्रम निपाणी (वार्ता) : नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने अनेक सोयी-सुविधा घरबसल्या मिळत आहेत. त्याप्रमाणे मानवाच्या चुकीमुळे पर्यावरणाचे समतोल बिघडून प्रदूषण वाढत आहे. याशिवाय वाहतुकीचे नियम माहीत नसल्याने रस्ते अपघातही दररोज घडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन येथील श्रीनगरमधील अंकुरण इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta