Tuesday , March 3 2026
Breaking News

बेळगाव

अन पिंपळाने घेतला मोकळा श्वास

शेरी गल्ली कोपऱ्यात देवतांच्या भग्न प्रतिमा, कचरा केला संग्रहित बेळगाव : शहरातील मध्यवर्ती ठिकाण असूनही रहिवासी आणि महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कचराकुंड बनलेल्या पिंपळाच्या पाराने आज मोकळा श्वास घेतला. सर्व लोकसेवा फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेरी गल्लीच्या कोपऱ्यातील पिंपळाच्या झाडाखाली टाकण्यात आलेल्या विविध देवदेवतांच्या जीर्ण प्रतिमांचे संकलन आणि कचरा हटवण्यात आला.रविवारी सकाळी फाऊंडेशनचे अध्यक्ष …

Read More »

बेळगावच्या बेलकोर इंडस्ट्रीजचे युवा उद्योजक कर्नाटक सरकारकडून सन्मानित

बंगळूर : १५ जुलै २०२१ हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कर्नाटक सरकार, सिडोक (CEDOK) यांच्या सहयोगाने कर्नाटकातील यशस्वी युवा उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी  कार्यक्रम आयोजित करण्यात आला.बेलगाव येथील पेपर पैकेजिंग बॉक्स तयार करण्यात गुंतलेल्या स्टार्टअप बेलकोर इंडस्ट्रीजला कर्नाटकातील 60 इतर …

Read More »

राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या हिंदी पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन

बेळगाव (प्रतिनिधी) : राणी चन्नम्मा विद्यापीठाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून पदवी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी मार्गसूचीनुसार सीबीसीएस अभ्यासक्रम लागू केला असून यानुसार डॉ. राजेंद्र पोवार यांनी संपादित केलेल्या द्वितीय सत्राच्या हिंदी विषयाच्या चार पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन गुरुवारी राणी चन्नम्मा विद्यापीठात व्हाईस चान्सलर प्रो. एम. रामचंद्र गौडा व रजिस्ट्रार प्रो. बसवराज पद्मशाली यांच्या …

Read More »

येडियुराप्पा यांचे पंतप्रधानांना दरमहा 1.5 कोटी लसीचे डोस देण्याचे आवाहन

बेंगळूर : कोरोना रुग्णांची संख्या काही राज्यांमध्ये पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी काय काय तयारी करण्यात आली याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत डिजीटल माध्यमातून बैठक घेतली आहे. यामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही सहभागी झाले होते. यावेळी येडियुराप्पा यांनी पंतप्रधान मोदींकडे महिन्याला 1.5 …

Read More »

बारावीचा 20 जुलैला निकाल

बंगळूर : कोरोना संसर्गामुळे रद्द झालेल्या बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षेचा निकाल 20 जुलै रोजी राहीर करण्यात येणार आहे. पदवीपूर्व परीक्षामंडळाने निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे. पीयूसी बोर्डाच्या संचालिका स्नेहल यांनी 20 जुलै रोजी बारावीचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल असे सांगितले. निकाल 20 जुलै रोजी विभागाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला …

Read More »

खानापूरात शिरशी-बेळगाव बस ड्रायव्हरला मारहाण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ शिरशीहून बेळगावकडे जाणाऱ्या बसला आडवून ड्रायव्हरला मारहाण करून रक्तबंबाळ केले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिरशीहून बेळगावकडे जाणारी शिरशी- बेळगाव बस खानापूर शहराजवळील रूमेवाडी क्राॅसजवळ आली असता मागुन आलेल्या कारमधुन काही युवकांनी बस थांबवुन ड्रायव्हरला मारहाण केली. यात त्याच्या नाकाला जबर मारहाण झाल्याने …

Read More »

तेरा वर्षीय बालिकेचा डेंग्यूमुळे मृत्यू

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील एका मुलीचा डेंग्यूमुळे आज शुक्रवारी दुपारी केएलई प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तिच्या मृत्यूमुळे गावात डेंग्यू संसर्गाची भीती निर्माण झाली आहे. बेळगाव तालुक्यातील मरगाई गल्ली, हलगा येथील 13 वर्षीय बालिका हर्षदा भीमराव संताजी असे डेंग्यूमुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. गेल्या कांही दिवसापासून हर्षदा …

Read More »

महाराष्ट्र १o वी बोर्ड परिक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर बोर्ड परिक्षा न झालेल्यामहाराष्ट्र राज्याच्या एस.एस.सी. बोर्डाचा दहावीचा निकाल उद्या दि. १६ जूलै रोजी दुपारी १ वाजता जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व …

Read More »

दहावी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी बेळगाव तालुक्यातील शिक्षकांना मार्गदर्शन

बेळगाव : येत्या सोमवार दिनांक 19 व गुरुवार दिनांक 22 जुलै 2021 रोजी होणाऱ्या इयत्ता दहावीच्या वार्षिक परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी म्हणून बेळगाव तालुक्यातील सर्व पी.ई. शिक्षक व स्काऊट अँड गाईड शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी मच्छे येथील डिवाइन मर्सी स्कूलमध्ये गुरुवार दिनांक 15 जुलै रोजी बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुक्याचे …

Read More »

खानापूर युवा समिती पाठवणार पंतप्रधानांना अकरा हजार पत्रे!

खानापूर : सीमाप्रश्नाच्या संदर्भातील प्रत्येक लढ्यात जांबोटी भागातील कार्यकर्ते नेहमीच अग्रभागी होते. म्हणूनच या भागाला महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. मात्र अलीकडे चळवळीला मरगळ आली असताना युवा समितीने नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. इथले युवक युवा समितीच्या प्रत्येक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होतील, असे आश्वासन जांबोटी …

Read More »