खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिक बाबल खंडेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली असली तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबल खंडेकर हे सकाळच्या वेळी जंगल परिसरात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हल्ल्यात जखमी झालेल्या बाबल खंडेकर यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात अस्वलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, जंगल परिसरात वावरताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta