Wednesday , March 4 2026
Breaking News

पद्मभूषण पुरस्कार विजेते, ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा यांचे निधन

Spread the love

 

बंगळूर : कन्नड सारस्वताच्या जगतात सरस्वती पुत्र म्हणून ओळखले जाणारे आणि प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ. एस. एल. भैरप्पा (वय ९४) यांचे आज निधन झाले. गेल्या अनेक दिवसांपासून ते वयोमानाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होते.
बंगळूर शहरातील राजराजेश्वरी नगर येथील राष्ट्रोत्थान रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचाराला यश न आल्याने गुरुवारी दुपारी त्यांचे निधन झाते ले. ते तीन महिन्यांपूर्वी म्हैसूरहून बंगळुरला आले होते. एका संपादकाच्या घरी राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उद्या सकाळपासून दुपारपर्यंत शहरातील रवींद्र कलाक्षेत्रात भैरप्पा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्याची व्यवस्था केली जाईल. त्यानंतर, गुरुवारी संध्याकाळी म्हैसूरमध्ये पूर्ण राजकीय सन्मानाने अंतिम संस्कार केले जातील, असे त्यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले.
२६ जुलै १९३४ रोजी हसन जिल्ह्यातील चेन्नरायपट्टण येथील संतेशिवरा येथे जन्मलेले ते एक दुर्मिळ लेखक होते, ज्यांचे राष्ट्रकवी कुवेम्पू नंतर साहित्यिक जगात सर्वात जास्त वाचक होते.
त्यांना देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषणनेही सन्मानित करण्यात आले. त्यांना प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार मिळेल, अशी वाचकांना अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही.
सरस्वती सन्मान पुरस्कार मिळालेल्या भैरप्पा यांनी भीमकाय, बेळकु मुडीतू, धर्मश्री, धर्मसरी, दूरसरीदरू, मतदान, जलपात, नेले, साक्षी, अंचू, तंतू, अवरण, यान, नाई नेरळू, ग्रहण, दाटू, संस्कार, पर्व, गृहभंग, कवलू, वंशवृक्ष, निराकरण, सार्थ, अन्वेशन, उत्तरकांड यांसारख्या कलाकृतींनी साहित्यविश्व समृद्ध केले. निराकरण, सार्थ, अन्वेषन, उत्तरकांड लेखनाच्या माध्यमातून कन्नड साहित्य जगतात त्यांनी एक अद्वितीय योगदान दिले. कनकपुर येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान त्यांना मिळाला. गांधीजींच्या मूल्यांनी प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्या लेखनातून मोठे योगदान दिले.
कन्नड भाषेत लिहिलेल्या भैरप्पा यांच्या रचना इंग्रजी आणि भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आणि भारतीय साहित्यातही लोकप्रिय झाल्या.
भारत सरकारने त्यांना २०२३ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या गावी प्राथमिक शिक्षण घेतलेल्या भैलप्पा यांनी आपले माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण म्हैसूरमध्ये पूर्ण केले. सुवर्णपदकासह एम.ए. पदवी पूर्ण करणाऱ्या भैरप्पा यांनी बडोद्यातील सयाजीराव विद्यापीठातून ‘सत्य आणि सौंदर्य’ या इंग्रजीतील प्रबंधासाठी त्याना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. गृहभंग, वंशवृक्ष, नेले, साक्षी, नाई नेरळू, तब्बली नीनादे मगने, दाटु, धर्मश्री, पर्व, भिक्ती यासारख्या भैरप्पांच्या कादंबऱ्या हिंदी आणि मराठीतही लोकप्रिय आहेत.
शोकसंदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या विवेकाला जागृत करणारे आणि भारताच्या आत्म्याचा सखोल अभ्यास करणारे भैरप्पा हे सर्वोच्च नेते होते. भैरप्पा यांचे भारतीय साहित्यात, विशेषतः कन्नड भाषेतील योगदानाने देशाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक परिदृश्यावर मोठी छाप सोडली आहे. भैरप्पा यांच्या निधनाने, आपण एक महान आणि धाडसी माणूस गमावला आहे ज्याने आपल्या विवेकाला जागृत केले आणि भारताच्या आत्म्यात खोलवर डोकावले. या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती माझी संवेदना,” असे मोदी म्हणाले.

मुख्यमंत्री सिध्दरामय्या
सारस्वत जगतातील ज्येष्ठ लेखक एस.एल. भैरप्पा यांच्या निधनाची बातमी वेदनादायक आहे. त्यांच्या निधनाने मला खूप वैयक्तिक दुःख झाले आहे. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो आणि देव त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी मी प्रार्थना करतो, अशी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन, पमाजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राज्यपाल थावरचंद गेहलोत, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा, एच. डी. कुमारस्वामी, निर्मला सीतारमण, प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक यांच्यासह अनेकांनी भैरप्पा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादकांना दिलासा; प्रतिटन ५० रुपये अनुदानासाठी ३०० कोटींची तरतूद

Spread the love  बंगळूर : राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे २०२५-२६ हंगामात साखर कारखान्यांना ऊस पुरवठा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *