Wednesday , December 10 2025
Breaking News

केंद्राने ‘अग्निपथ’ रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी : विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या

Spread the love

हुबळी : केंद्र सरकारने अग्निपथ योजना रद्द करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी केली.
हुबळी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, केंद्राच्या अग्निपथ योजनेला काँग्रेसचा विरोध आहे. 4 वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची काय परिस्थिती होईल याचा विचार केंद्राने केला आहे का? या योजनेच्या विरोधात हिंसक आंदोलन करू नये. शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंदोलकांशी सरकारने चर्चा केली पाहिजे. अग्निपथ योजनेंतर्गत होणारी भरती थांबवली पाहिजे, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *