लेफ्टनंट रोहित कामत : मोहनलाल दोशी विद्यालयात सत्कार निपाणी (वार्ता) : शाळेने सर्वार्थाने मला घडवले. भारतीय सैन्यदलामध्ये यापुढे प्रामाणिकपणे सेवा करून शाळेचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहे. सैन्यात आपण जरी लेफ्टनंट असलो तरी शाळेसाठी कायमपणे रोहित कामतच असणार आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्ट, जिद्द या जोरावर …
Read More »दुर्गमभागातील जांबोटी कन्नड शाळेला शिक्षण मंत्र्यांची भेट
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका हा अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून परिचित आहे. कर्नाटक राज्यातील सर्वात मागासलेला शिक्षणाच्या सोयीपासून वंचित राहिलेला तालुका म्हणजे खानापूर तालुका अशी ओळख आहे. नुकताच बेळगावात झालेल्या अधिवेशनासाठी आलेल्या शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी खानापूर तालुक्यातील मागासलेल्या दुर्गमभागातील शाळांचा दौरा करताना जांबोटी येथील मराठी प्राथमिक …
Read More »मास्केनट्टीत तलावात पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन
खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायत हद्दीतील मास्केनट्टीतील जाणू विठ्ठल जंगले (वय 22) याचा रविवारी दि. 19 रोजी गावापासून जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात पडून मृत्यू झाला. ही बातमी समजताच खानापूर तालुका भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मास्केनट्टीतील जंगले कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच नियती फाऊंडेशनच्या …
Read More »‘बाहुबली भगवान की जय हो’च्या जयघोषणात महामस्तकाभिषेक
संकेश्वर (वार्ता) : पोदनपूर येथे समस्त भक्तगणांचे डोळ्यांचे पारणे फेडणारा भगवान बाहुबली 13 फूट उतंग नयन मनोहर मूर्तीवर पंचामृताचा महामस्ताभिषेक सोहळा तपस्वी सम्राट आचार्य श्री ज्ञानेश्वर मुनिमहाराज यांच्या दिव्य सानिध्यात भक्तीमय वातावरणात पार पडला. दिगंबर जैन समाजातील भक्तगणांनी भगवान बाहुबली मूर्तीवर जलाभिषेक, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, दूध-दही, तूप, हळद कुंकूम …
Read More »चुरशीच्या लढतीत ईर्षेने मतदान!
बोरगाव नगरपंचायतीसाठी 82 टक्के मतदान : 50 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद निपाणी (वार्ता) : बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कर्नाटक महाराष्ट्रमधील राजकीय केंद्रबिंदू असलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी सोमवारी झालेल्या चुरशीच्या लढतीत मतदारांनी ईर्षेने मतदान केले. सर्वच पक्षांनी आपापल्या प्रभागातील मतदारांना ज्ञान करण्यासाठी दुचाकीसह चार चाकी वाहनांची सोय केली होती. …
Read More »अटलबिहारी वाजपेयी यांचे कार्य अविस्मरणीय : किरण जाधव
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी विमल फौंडेशनचा अभिवादन कार्यक्रम बेळगाव : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आज साजरा करण्यात आला. विमल फौंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी देशहितासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. जय जवान, जय किसान बरोबरच जय …
Read More »महाराष्ट्र खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार : खास. शरद पवार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शिष्टमंडळाने आज सिल्व्हर ओक येथे माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि खासदार शरद पवार यांची भेट घेतली. सीमाभागात कर्नाटक शासनाकडून मराठी बांधवावर होत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबनेनंतर आक्रोश व्यक्त करण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात जमलेल्या मराठी तरुणांवर बेळगावच्या विविध पोलीस ठाण्यात …
Read More »धर्मांतर कायद्याबाबत काँग्रेस-भाजपचे नाटक : एच. डी. कुमारस्वामी
बेळगाव (वार्ता) : केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. राज्यातील कन्नड भाषिकांची चिंता या सरकारला नाही तसेच आतापर्यंत केंद्र सरकारनेही राज्यातील जनतेची कोणती मदत केली नाही, असा आरोप माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केलाय. बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हि प्रतिक्रित दिली आहे. कृष्णा नदी प्रकल्पाची राष्ट्रीय योजना करण्यासाठी तत्कालीन …
Read More »विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई
बेळगाव (वार्ता) : विद्यापीठांनी शिक्षणास पोषक वातावरण निर्माण करावे. वर्तमान काळ ज्ञानाचे शतक आहे. जगाची शक्ती ज्ञानाकडे झुकते. विद्यापीठांनी हे लक्षात घेऊन शिक्षणाचा दर्जा सुधारावा. विद्यापीठे हे ठोस संशोधनाचे व्यासपीठ असावे, असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केले आहे. हिरेबागडेवाडी येथे 126 एकर परिसरात उभारण्यात येत असलेल्या राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या …
Read More »कोगनोळी शेतकर्यांना विश्वासात घेऊन काम करा
राजू पोवार : रयत संघटनेचे सार्वजनिक बांधकाम मंत्र्याना दिले निवेदन कोगनोळी (वार्ता) : राष्ट्रीय महामार्गाचे प्राधिकरण होणार असून या ठिकाणी कोगनोळी येथील शेतकर्यांची सुपीक जमीन प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जाणार असून शेतकर्यांचे मोठे नुकसान होणार आहे. यासाठी शेतकर्यांना विश्वासात घेऊनच या ठिकाणचे सहा पदरीकरण करण्याचे काम करावे अशी मागणीचे निवेदन सार्वजनिक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta