Wednesday , March 4 2026
Breaking News

Belgaum Varta

कणगला बैलगाडी शर्यतीत तासगांवचे प्रमोद थोरात यांची बैलजोडी प्रथम

संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त करजगा रस्त्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथील दुबैलगाडी शर्यतीत सात दुबैलगाडी सहभागी झाल्या होत्या. सात किलोमीटरचे अंतर फर्लांगभर अंतराने पार करीत तासगांवचे प्रमोद थोरात यांच्या बैलजोडींने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावर अथनीच्या शंकर …

Read More »

संकेश्वरात श्री सिध्दी ट्रेडर्सचे थाटात उद्घघाटन

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-हुक्केरी रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या श्री सिध्दी ट्रेडर्सचे उदघाटन उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती यांचे हस्ते फित सोडून करण्यात आला. यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, श्री सिध्दी ट्रेडर्सने सर्व प्रकारचे लेटेस्ट टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट, सिरॅमिक उपलब्ध करुन नव्याने घर बांधणाऱ्या लोकांची उत्तम सोय केली …

Read More »

समिती सोडून गेलेल्यांचा विचार न करता मराठीसाठी लढा तीव्र करुया : रणजीत पाटील

खानापूर : जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार

भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी चार केंद्रीय मंत्र्यांना पाठवणार केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग हे स्थलांतर मिशनमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. युक्रेनमधील परिस्थितीदरम्यान एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्याचा दावा केला …

Read More »

मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं 28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’  म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. कारण 1928 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध भारतीय संशोधक डॉ.सी.व्ही.रमन यांनी याच दिवशी जगप्रसिद्ध ‘रमन इफेक्ट’चा शोध लावला होता. पुढे 1930 मध्ये …

Read More »

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद

पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद तिच्या संस्कारांचा प्रभाव राजेंद्रबाबूंच्या जीवनावर अखेरपर्यंत होता. राजेंद्रबाबूंचे प्राथमिक शिक्षण मौलवींतर्फे घरीच पारंपरिक पद्धतीने झाले. पुढे छपरा, हथवा व पाटणा या ठिकाणी शालेय शिक्षण घेऊन त्यांनी कोलकात्यातील प्रेसिडेन्सी महाविद्यालयांतून बी. ए., एम. ए., बी. एल (१९०९) व एम. एल. या पदव्या मिळविल्या.   भारतीय स्वातंत्र्य …

Read More »

खानापूरात महाशिवरात्रीनिमित्त शिवालये सजली!

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यातील विविध गावातील शिवालये मंदिरे मंगळवारी दि. १ मार्च रोजी होण्याऱ्या महाशिवरात्रीच्या सणानिमित्त मंदिरातून रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई आदीच्या कामाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली आहे. खानापूर शहरातील हेस्काॅम कार्यालयाच्या आवारात असलेल्या महादेवाच्या मंदिरात सालाबादप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीच्या सणाचे औचित्य साधुन मंदिराची रंगरंगोटी, सजावट, विद्युत रोषणाई, मंडप …

Read More »

बेळगाव रिंगरोडसह जिल्ह्यातील बारा राज्यमहामार्गांच्या कामांना मंजुरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा बेळगाव :  बेळगाव शहरा सभोवतालच्या रिंगरोडची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. सदर रिंग रोड कामाबरोबरच बेळगाव जिल्ह्यातील 12 राज्य महामार्ग कामांना आपण मंजुरी देत आहोत. लवकरच या नव्या रस्ते कामांना प्रारंभ होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी आज सोमवारी बेळगावात …

Read More »

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालय 2 मार्चला निकाल देण्याची शक्यता

नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षण प्रकरणी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलली आहे. बुधवारी, 2 मार्च रोजी न्यायालय यासंबंधी निकाल देण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निकालावर ओबीसींचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अवघ्या राज्याचे त्याकडे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसींच्या 27 …

Read More »

जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्‍यांशी चांगले वागायला हवं : संभाजी यादव यांचे प्रतिपादन

बेळगाव : वेगवेगळे किस्से, विनोद आणि कविता सादर करीत राधानगरीच्या संभाजी यादव यांनी प्रचंड हशा आणि टाळ्या मिळवीत येळळूरमधील रसिक जनतेला आपल्या हास्य दरबारात रंगवून ठेवले. साहित्य संमेलनातील दुसरे सत्र हसण्यासाठी जगा आणि जगण्यासाठी हसा सादर करताना संभाजी यादव यांनी जीवन चांगलं जगायला हवं असेल तर सार्‍यांशी चांगलं बोलायला हवं, …

Read More »