National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं
28 फेब्रुवारी 1928 हा दिवस भारतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासामध्ये या दिवसाचं महत्त्व मोठं आहे. कारण 1928 मध्ये याच दिवशी प्रसिद्ध भारतीय संशोधक डॉ.सी.व्ही.रमन यांनी याच दिवशी जगप्रसिद्ध ‘रमन इफेक्ट’चा शोध लावला होता. पुढे 1930 मध्ये याच संशोधनासाठी डॉ.सी.व्ही.रमन नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. त्यामुळे 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
सध्याचं आधुनिक युगात विज्ञानाला फार महत्त्व आहे. विज्ञानातील प्रगतीमुळेच लोकांचे जीवन सुकर झालं आहे. भारताने अलीकडच्या काळात लक्षणीय वैज्ञानिक प्रगती केली आहे. भारताचं मंगळयान, चांद्रयान हे याचंच द्योतक! काही दिवशी भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी पुढं येत आहेत.