खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील हत्तरगुंजी डुक्करवाडी, मुडेवाडी रस्ता चिखलाने माखला कारण यंदाच्या मुसळधार पावसाने तालुक्यात थैमान घातले. अनेक रस्त्याचे तीन तेरा वाजले असताना खानापूर डुक्करवाडी, मुडेवाडी, हत्तरगुंजी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.याबाबत माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी कंत्राटदाराने या रस्त्यावर केवळ शेडू मिश्रीत माती टाकून रस्त्याचे काम केले. त्यामुळेच …
Read More »मराठी भाषिकांनी जास्तीत जास्त पत्रे पाठवून सीमाप्रश्नाची जागृती करावी : समिती नेते आबासाहेब दळवी
शहर व उपनगरातील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक
बेळगाव : शहर व उपनगरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने मंगळवार दि. १० ऑगष्ट रोजी सायंकाळी ४.३० वा. सिद्धजोगेश्वर मंदिर (शनिमंदिर जवळ) बोलाविण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रणजीत चव्हाण पाटील अध्यक्ष, रमाकांत कोंडुसकर कार्याध्यक्ष, शिवराज पाटील सरचिटणीस यांनी केले आहे.
Read More »कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप; कत्ती यांच्याकडे वन व अन्न आणि नागरी पुरवठा खाते
शशिकला जोल्ले यांना धर्मादायसह हज व वक्फ खाते बेंगळुरू : कर्नाटकात मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर झाले आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांनी महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. मुख्यमंत्री बोम्मई यांनी अर्थ, बंगळूर विकास आणि मंत्रिमंडळ कामकाज यासह महत्वाची खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. पहिल्यांदाच मंत्री बनलेल्या अरगा ज्ञानेंद्र यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली …
Read More »पहिले पत्र पाठवून खानापूर युवा समितीच्या उपक्रमाचा शुभारंभ!
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे 9 ऑगस्ट क्रांती दिनी हुतात्मा नागाप्पा होसूरकर यांच्या पत्नी तुळसा होसुरकर यांच्या हस्ते दुपारी 12 वाजता पहिले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसह सीमाभागातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी व …
Read More »नीरज चोप्राचा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण वेध!
टोक्यो : भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोपडाने सुवर्ण पदकाची ऐतिहासिक कमाई केली आहे. तब्बल तेरा वर्षानंतर भारताने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. आजच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निरजने पहिल्या प्रयत्नात 87.03 व दुसऱ्या प्रयत्नात 87.58 मीटर भालाफेक करत विजयाची नांदी दिली. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर तर निरजचा चौथा प्रयत्न फाऊल …
Read More »बजरंग पुनिया कांस्य पदकाचा मानकरी
टोकियो : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आज कझाकिस्तानच्या डाऊलेट नियाझबेकोव्हशी कांस्य पदकासाठी भिडला. त्याने सामन्यावर एकहाती वर्चस्व राखत ८–० अशा गुण फरकाने कांस्य पदकावर नाव कोरले.बजरंगने पहिल्यापासून सामन्यावर पकड मिळवून दोन गुण मिळवले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये त्याने चार गुणांचा कमाई करत आघाडी ६–० अशी नेली.सामन्यास काही सेकंद शिल्लक असताना त्याने …
Read More »मुसळधार पावसाने लालवाडी-चापगाव रस्त्यावरील पुल ढासळला
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील लालवाडी- चापगाव रस्त्यावरील कारलगा गावजवळील पुलाचा काही भाग नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे भविष्यात याचा पुलाला धोका पोहोचू शकतो. त्याच बरोबर याच कारलगा पुलाच्या मधोमध भगदाड पडले आहे. त्यामुळे दुचाकी, अथवा चार चाकी वाहने जाताना धोका संभवतो आहे. रात्री अपरात्रीच्या वेळी वाहनाना जाताना …
Read More »चिखलाचे साम्राज्य पसरले खैरवाड रस्त्यावर
खानापूर (प्रतिनिधी) : रस्ता नव्हे, केवळ चिखलच पसरला आहे. अशी परिस्थिती खानापूर तालुक्यातील खैरवाड गावच्या मुख्य रस्त्यावर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.गावापासुन रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावरून दुचाकी वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या रस्त्यावरून पायी चालत …
Read More »यड्राव येथे दीड वर्षाच्या मुलीचे भटक्या कुत्र्यांनी तोडले लचके
यड्राव (जि. कोल्हापूर) : यड्राव येथील रेणुका नगरमध्ये पटांगणात खेळणाऱ्या बालिकेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केले. भटक्या कुत्र्यांनी तिचे डोके, मान व डाव्या हाताच्या दंडाचे लचके तोडून गंभीर जखमी केले. मनस्वी अक्षय गायकवाड (वय दीड वर्षे) असे तिचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास यड्राव येथील रेणुकानगर दक्षिण भागात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta