Friday , March 6 2026
Breaking News

Belgaum Varta

ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

  खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल, ओलमणी येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा व पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात उपलब्ध ध्येय निश्चित करून दुसरे यांच्याबरोबर न जाता आपलं स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःची निर्णय घेण्यासाठी सक्षमता बाळगावी असे मत प्रमुख वक्त्या म्हणून सौ. अनिता दत्ता कणबर्गी यांनी यावेळी …

Read More »

खानापूर : हलशीवाडी येथे खांब बदलण्याचे काम सुरू; ग्रामस्थांमधून समाधान

  खानापूर : हलशीवाडी येथील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या व धोकादायक खांबे हटवावेत अशी मागणी निवेदनाद्वारे हेस्कॉमकडे करण्यात आली होती याची दखल घेत सोमवारपासून खांब बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. हलशीवाडी येथे अनेक वर्षांपूर्वी वीज खांबे उभारून वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र …

Read More »

आशा पत्रावळी यांना ‘तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान

  बेळगाव : बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी लोकरीच्या विणकामातून विविध कलाकृती करून राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवल्याबद्दल नाशिक येथील ग्राहक रक्षक समितीतर्फे त्यांना तेजस्विनी महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांनी १६६ अनोख्या लोकरीच्या वस्तू तयार केल्याबद्दल त्यांची ‘इन्क्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये नोंद झाली आहे. आशा पत्रावळी यांनी जपानी विणकाम …

Read More »

एस एस क्लासेसतर्फे दहावीसाठी मोफत समर व्हेकेशन

  बेळगाव : शाहूनगर येथील एस एस क्लासेस मध्ये नियमित प्रवेश घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत समर व्हेकेशनचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मर्यादित जागा असल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन एस एस क्लासेस व्यवस्थापनाने केले आहे. कोरोनापूर्वी सुरू असलेल्या एस एस क्लासेसने पुन्हा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन क्लासेसची …

Read More »

महाराष्ट्र मंडळातर्फे शब्दाक्षरी स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : महाराष्ट्र मंडळ, बेंगलोर यांच्या वतीने राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने मराठी प्रेमींसाठी “शब्दाक्षरी” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाण्यांची जशी वेगवेगळ्या फेऱ्यांची अंताक्षरी असते तशी मराठी शब्दांवर, साहित्यावर, गाण्यांवर आधारित विविध रंजक फेऱ्यांची ही अनोखी स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ऑनलाइन होणार असून अंतिम …

Read More »

सौन्दत्तीजवळ झालेल्या कार-लॉरी अपघातात तीन ठार

  अंकली : कार आणि लॉरी यांच्यात भीषण अपघात झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सौन्दत्ती यल्लम्मा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला असून तुकाराम कोळी (72), रुक्मिणी कोळी (62) आणि सांगली येथील कल्पना अजित कोळी (32) यांचा जागीच मृत्यू झाला तर कार चालकासह आदित्य कोळी (11), …

Read More »

गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीपासून दहा नंदी (गोवंश) यांना जीवदान

  निपाणी : श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण सेवा समिती यांच्या वतीने महाराष्ट्र मधून कर्नाटक मध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या दहा गोवंश यांना जीवदान देण्यात आले. पेठ वडगाव येथून कत्तलीसाठी दहा बैल घेवून जाणार आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समितीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मानद पशुकल्यान …

Read More »

बंगळूरात ७५ कोटीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त

  राज्यातील सर्वात मोठा ड्रग्जचा पर्दाफाश; दक्षिण अफ्रिकेच्या दोघांना अटक बंगळूर : कर्नाटकच्या इतिहासातील सर्वात मोठ्या ड्रग्ज विरोधी कारवाईत, शहरात ७५ कोटी रुपये किमतीचे ३७.८७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. निश्चित माहितीच्या आधारे, मंगळुर सीसीबी पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून बंगळुरमध्ये कारवाई हाती घेतली आणि परदेशी नागरिकांना अटक केली. दिल्लीतील …

Read More »

तिलारी व जंगमट्टीच्या धरणाचे पाणी मार्कंडेय नदीमध्ये वळविण्यासंदर्भात आम. शिवाजी पाटील यांना निवेदन

  बेळगाव : महाराष्ट्र सीमेवरील तिलारी धरणाचे जे कोंकणात वाहून जात असलेले व जंगमट्टीचे शिल्लक असलेले पाणी सीमाभागातील मार्कंडेय नदीमध्ये वळविल्यास महाराष्ट्रातील तुडये, हाजगोळी, सरोळी, डेकोळी, डेकोळीवाडी, सुरुते, शिनोळी खुर्द तथा शिनोळी बुद्रुक तसेच सीमाभागातील राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी, कल्लेहोळ, बाची, तुरमुरी, उचगांव, सुळगा, हिंडलगा, आंबेवाडी, कंग्राळी खुर्द तथा कंग्राळी …

Read More »

जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीची बैठक संपन्न

  गडहिंग्लज : गडहिंग्लज येथे होणाऱ्या पहिल्या जनवादी युवा साहित्य संस्कृती संमेलनाचे उदघाटक म्हणून जेष्ठ लेखक डॉ. राजन गवस यांना तर समारोप सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिध्द तरुण लेखक बालाजी सुतार यांना निमंत्रित करण्याचा निर्णय आज झालेल्या संयोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रा. स्वाती महेश कोरी होत्या. डॉ. …

Read More »