Sunday , March 8 2026
Breaking News

Belgaum Varta

अथणी येथे मुस्लिम दाम्पत्यावर भाजप नेत्याचा हल्ला

  बेळगाव : अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात चिक्कोडी लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान भाजपच्या स्थानिक नेत्याने एका मुस्लिम दाम्पत्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदानादरम्यान झालेल्या गदारोळात एका मुस्लिम जोडप्याला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून भाजपचे नेते बाबासाहेब दोंडीराम शिंदे यांनी या दाम्पत्याला मतदान केंद्रातून खेचून आणून त्यांच्याच दूध डेअरीत …

Read More »

कोव्हिशिल्ड लशीच्या साईड इफेक्टसची जोरदार चर्चा; जगभरातून लशीचा साठा परत मागवणार

  मुंबई : कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी …

Read More »

दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज

  दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा २० धावांनी पराभव करत मोठा विजय आपल्या नावे केला आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनने ८६ धावांच्या खेळीसह संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण संजू झेलबाद झाल्याने सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने गेला. संजूला बाद देण्याचा निर्णय हा वादग्रस्त असल्याचे म्हटले जात आहे. संजूला शुभम दुबेनेही मोठे …

Read More »

हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

  हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या …

Read More »

सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत, सवलतीत प्रवेश योजना

  कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्यावतीने सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत, सवलत प्रवेश योजना राबविण्यात येणार आहे. याचा ८६५ मराठी भाषिक गावातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सवलत प्रवेश योजना विद्यापीठाने जाहीर केली आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व अभ्यासक्रमांसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ तर …

Read More »

तिसऱ्या टप्प्यात ६१.४५ टक्के नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क; सर्वाधिक मतदान आसाममध्ये

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात एकूण ६१.४५ टक्के नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तिसऱ्या टप्प्यात आसामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद झाली. तर महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झाल्याचं बघायला मिळालं. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, आसामामध्ये सर्वाधिक …

Read More »

कोल्हापुरात चुरशीने 71 टक्के, तर हातकणंगलेत 68.07 टक्के मतदान

  कोल्हापूर : स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कोल्हापूर मतदारसंघात काल (मंगळवार) चुरशीने ७१ टक्के, तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाले. ही आकडेवारी अंतिम नसून यामध्ये बदल होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रात्री स्पष्ट केले आहे. दरम्यान, मतमोजणी चार जूनला होणार आहे. चंदगड शहरातील …

Read More »

आमचं सरकार आल्यानंतर प्रज्ज्वल रेवण्णाची जबाबदारी मोदींच्या गळ्यात बांधणार : उद्धव ठाकरेंचा घणाघात

  “प्रज्ज्वल रेवण्णाला मत म्हणजे मला मत, असं मोदींनी जाहीर सभेत सांगितले. मग त्यांनी केलेले गुन्हे तुमच्या माथी मारायचे की नाही? मारले पाहिजेत ना? तो रेवण्णा आज फरार झालेला आहे. इकडे साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही रात्री अपरात्री पोलीस पाठवता. अजूनही दमदाटी सुरु आहे. …

Read More »

बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.38 टक्के तर चिक्कोडीत 78.51 टक्के मतदान

  बेळगाव : लोकशाहीचा सण असलेली निवडणूक शांततेत पार पडली असून चिक्कोडी लोकसभा मतदारसंघ 78.51 टक्के तर बेळगाव लोकसभा मतदारसंघ 71.38 टक्के तसेच बेळगाव जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कॅनरा लोकसभा मतदारसंघातील कित्तूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. एकूण गतवेळच्या तुलनेत …

Read More »

अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपा कार्यकर्त्यांनी गंगाजलने स्वच्छ केला मंदिर परिसर

  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी सोमवारी उत्तर प्रदेशाच्या कन्नौज येथील गौरी शंकर महादेव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली. मात्र, अखिलेश यादव मंदिरातून बाहेर पडताच भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी हे मंदिर गंगाजलने स्वच्छ केल्याचं पुढे आलं आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया …

Read More »