Sunday , September 8 2024
Breaking News

खानापूर

अतिवृष्टीमुळे खानापूर, बेळगाव ग्रामीण व कित्तूर तालुक्यातील अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर

  खानापूर : बेळगाव जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे, बेळगाव ग्रामीण, खानापूर तालुका आणि कित्तूर तालुक्यांतील अंगणवाड्यांना सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, यांनी एका आदेशान्वये दिली आहे. खानापूर तालुका, बेळगाव ग्रामीण आणि कित्तूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे बालकांना अंगणवाड्यांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे. त्यासाठी मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून, मंगळवार …

Read More »

गावे स्थलांतरीत करण्याच्या निर्णयासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी

  खानापूर : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने …

Read More »

मराठा मंडळ कॉलेजजवळ असलेल्या दुभाजकाला दुचाकीची धडक; युवकाचा मृत्यू

  खानापूर : मराठा मंडळ पदवी कॉलेजजवळ असलेल्या खानापूर-बेळगाव महामार्गावरील पुलाखाली असलेल्या संपर्क रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुभाजकला दुचाकीची धडक होऊन दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील हलकर्णी गावातील निखिल नागेंद्र उर्फ नागो गुंजीकर (वय 22) हा दुचाकीस्वार युवक बेळगावहून खानापूरकडे येत असताना रात्री …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

  बेळगाव : बदली करुन घेतलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक किंवा अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय शिक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी सोडू नये तसेच खानापूर तालुक्यातील मराठी शाळांचा पदभार मराठी विषयांच्या शिक्षकांकडे देण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांच्याकडे करण्यात आली आहे. खानापूर तालुका समितीचे …

Read More »

खानापूर तालुक्यातील सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक रविवारी

  खानापूर : सर्व सरकारी शाळा वाचविणे अभियानच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील सर्व मराठी, कन्नड तसेच उर्दु सरकारी शाळेच्या शाळा सुधारणा कमिटीची बैठक रविवारी बोलावण्यात आली आहे. सरकारी शाळेच्या पटसंख्येत होणारी घट तसेच अतिथी शिक्षक नियुक्ती तसेच विविध अडचणीवर होणार चर्चा असून या बैठकीत सर्व शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष तसेच शिक्षण …

Read More »

हालात्री नदी पुलावरून वाहून जाणारा बचावला!

  खानापूर : गोव्याहून हेमाडगा मार्गे खानापूरकडे आपल्या दुचाकीवरून येत असताना बेळगाव शहापूर येथील व्यक्ती विनायक जाधव या व्यक्तीने मणतूर्गा जवळील हालात्री नदीवरील पुलावर दुचाकी घातल्याने दुचाकीसह वाहून जात असताना नदीकाठावरील झुडुपातील फांदी पकडून धरली आणि आरडाओरडा करू लागला. याबाबतची बातमी वाऱ्यासारखी पसरली असता खानापूर येथील अग्निशामक दलाची गाडी व …

Read More »

देवराई गावाजवळ शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील देवराई गावाजवळ सोमवारी सायंकाळी गुरे चारून घरी परतणाऱ्या एका वृद्ध शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला. अस्वलाने गावातील शेतकरी नारायण चौरी (65) यांच्यावर मागून हल्ला केला. त्यांच्या पाठीला व डोक्याला दुखापत केली. ही घटना नागरगाळी वनपरिक्षेत्रातील देवराई गावाजवळ घडली, नारायण यांच्या ओरडण्याच्या आवाजाने …

Read More »

…येथे ओशाळला मृत्यू! कृष्णापूर गावातील भयंकर परिस्थिती

  खानापूर : खानापूर तालुक्यातील कृष्णापूर हे गाव तालुक्याच्या पश्चिम घाटात वसले आहे. गोवा सीमेपासून अवघ्या 20 कि.मी. तर हेमाडगा पासून 40 कि. मी. अंतरावर आहे. अवघ्या 30 ते 40 कुटुंबाचा समावेश असलेल्या या गावात रस्त्यांसह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दैनंदिन जीवन जगणे देखील आव्हान बनले. एकीकडे खानापूर शहरात हायटेक …

Read More »

कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड ट्रक कोसळला!

  खानापूर : कणकुंबी एक्साईज नाक्याजवळ अवजड वाहतूक करणारी 12 टायरची ट्रक आज सोमवार दिनांक 29 जुलै रोजी सकाळी नाल्यात कोसळली. या मार्गावर अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिलेले असताना देखील या ट्रकला या मार्गाने कोणी सोडले असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने …

Read More »

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची खानापूर येथील पूरग्रस्त भागाला भेट

  खानापूर : पश्चिम घाटात सतत पडत असलेल्या पावसामुळे पुराचा धोका निर्माण झालेल्या खानापूर तालुक्यातील मलप्रभा पूल आणि रुमेवाडी बॅरेजला महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आज भेट दिली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. खानापुरा तालुक्यातील पश्चिम घाट भागातील डोंगरांच्या मधोमध असलेल्या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे हे आमचे उद्दिष्ट …

Read More »