Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

रायचूरात दूषित पाण्यामुळे तिघांचा मृत्यू; कुटुंबांना 5 लाख भरपाई : मुख्यमंत्री

बेंगळुरू : रायचूरमध्ये दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना सरकारने गांभीर्याने घेतली आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली. बंगळुरू येथील आरटी नगर येथील त्यांच्या निवासस्थानी सोमवारी प्रसार माध्यमांशी बोलताना बसवराज बोम्मई यांनी ही माहिती देऊन सांगितले …

Read More »

रोपे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार : ए. एच. मोतीवाला

पर्यावरण दिनी सत्कार निपाणी (वार्ता) : प्लास्टिकचा अतिवापर आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. परिणामी शुद्ध हवा मिळणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळजी गरज आहे. त्यामुळे येत्या काळात झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. …

Read More »

गंगवाळी वनविभागात जागतिक पर्यावरण दिन साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पृथ्वीमातेचे आपापल्या विध्वंसक कृत्यांमुळे शोषण होत आहे. आणि आपली पर्यावरण प्रणाली लोप पावत आहे. यासाठी पुन्हा पर्यावरण प्रणाली संतुलनात आणण्यासाठी बरीच कारणे आवश्यक आहेत. म्हणून निरोगी आणि टिकाऊ वातावरण केवळ आपल्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे. आपण नेहमी जबाबदार वर्तन दाखवुन हवा आणि पाणी तसेच वन्यजीवांचे संरक्षण …

Read More »

खानापूर तालुका समितीच्या अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची निवड

खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नूतन अध्यक्षपदी गोपाळराव देसाई यांची एकमताने निवड झाली. यावेळी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व कार्यकारिणीचे सदस्य, समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. समितीचे ज्येष्ठ नेते सूर्याजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. सुरेश देसाई यांनी गोपाळ देसाई यांचे नाव अध्यक्ष पदासाठी सुचवले त्याला अनुमोदन …

Read More »

प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक : डॉ. अच्युत माने

आंदोलन नगरात वृक्षारोपण : दौलतराव पाटील फाउंडेशनचा उपक्रम निपाणी : वातावरणातील बदल आणि प्लॅस्टिकचा वापर यामुळे दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्याचा जीवसृष्टीवर आघात होत असून प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यासाठी वृक्षारोपण हाती घेणे गरजेचे आहे, असे मत प्रा. डॉ. अच्युत माने यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण …

Read More »

राज्यातील जनतेला सुखाने जगू द्या : एच. डी. कुमारस्वामी

बेळगाव : राज्यातील जनतेला सुखाने-सन्मानाने जगू द्या, तुमच्या-तुमच्या चड्ड्या फाडा, पण जनतेच्या चड्ड्या फाडू नका अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांना सुनावले. बेळगावात रविवारी पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले, एकमेकांच्या चड्ड्या काढल्याने यांना काय मिळते? आधी काँग्रेसवाल्यांनी चड्डी काढली. त्यानंतर गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी काँग्रेसची …

Read More »

सिद्धरामय्यांकडून संघाविषयी अपप्रचार : मुख्यमंत्री बोम्मई

बेंगळुरू : गेल्या 75 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसेवा करत आहे. मात्र सिद्धरामय्या संघाविषयी अपप्रचार करत सुटले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली. ‘संघाची चड्डी समाजात भांडणे लावत सुटली आहे’ या काँग्रेस नेत्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, संघाने देशभक्ती केली आहे. संकटात लोकांना सहाय्य केले आहे. …

Read More »

देवाप्पा गुरव यांच्या राजीनाम्यासंदर्भात हस्तक्षेप करण्यास मध्यवर्तीचा नकार

खानापूर : खानापूर तालुका घटक समिती अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी तब्येतीच्या कारणास्तव संघटनेचे सचिव गोपाळ देसाई यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे त्या राजीनाम्याची एक प्रत गोपाळ देसाई यांनी मध्यवर्तीकडे दिली असता मध्यवर्ती राजीनामा मंजूर करणे किंवा अध्यक्ष निवड करण्याबाबत हस्तक्षेप करणार नाही. या सर्व बाबींवर त्या-त्या घटक समितीने निर्णय …

Read More »

पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित समितीचे काम संपल्याने निर्णय, नवीन समिती नाही

बंगळूर : कर्नाटक राज्य सरकारने राज्य पाठ्यपुस्तक पुनरावलोकन समिती विसर्जित करण्याची घोषणा केली आहे. पाठ्यपुस्तकांच्या सुधारणांवरून वाद सुरू असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले की, समितीचे नियुक्त कार्य पूर्ण झाल्यामुळे ती बरखास्त करण्यात आली आहे. कोणतीही आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास सरकार पुढील सुधारणा करण्यास तयार आहे …

Read More »

माणकापूर येथे समाजकंटकाकडून शाळा इमारतीचे नुकसान

निपाणी : माणकापूर येथे समाजकंटकाकडून कन्नड शाळा इमारतीचे नुकसान करण्यात आले आहे. माणकापूर कन्नड शाळेत एका माथेफिरुने कन्नड शाळेच्या शैक्षणिक साहित्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले आहे. तसेच सौचालयाची देखील तोडफोड करण्यात आली आहे. शाळा हे एक ज्ञानमंदिर आहे आणि अश्या ज्ञानमंदिराचे जाणूनबुजून नुकसान करणाऱ्या माथेफिरूवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, …

Read More »