पर्यावरण दिनी सत्कार
निपाणी (वार्ता) : प्लास्टिकचा अतिवापर आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे निसर्गाचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. परिणामी शुद्ध हवा मिळणे कठीण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन वृक्षारोपण ही काळजी गरज आहे. त्यामुळे येत्या काळात झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांनी व्यक्त केले. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण व्यवस्थापक संजय साळुंखे यांनी ए.एच. मोतीवाला यांचा सत्कार केला. गोव्याचे मुख्यंमत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते मोतीवाला यांचा सन्मान झाला होता.
अभियंते संजय साळुंखे म्हणाले, पर्यावरण आणि मानव यांचे नाते अतूट आहे. पर्यावरणाविषयी आपले अस्तित्वच शक्य नाही. पर्यावरणाबद्दल जागृती व्हावी. तसेच पर्यावरणामध्ये सकारात्मक बदल घडण्यासाठी सर्वत्र वृक्षारोपण झाले पाहिजे.
सत्कारानंतर ए. एच. मोतीवाला यांनी या पावसाळ्यात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा सकल्प जाहीर केला. जागतिक तापमानात वाढ, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड दुष्काळ व महापूर अशा समस्या सध्या भयंकर प्रमाणात आपल्या समोर असल्यामुळे पर्यावरण संतुलन टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे. वातावरण शुद्ध राखण्यासाठी वृक्ष फार मोलाचा वाटा आहे. तसेच पाऊस पडण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास हा महत्त्वाचा दुवा ही झाडे झुडपे आहेत. असेही ते म्हणाले. यावेळी प्रसाद कुलकर्णी, धनंजय मोकाशी, श्रीकांत माळगे, सहदेव कांबळे, संजय माने यांच्यसह पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Check Also
बाळूमामा व बालाजीनगरातील प्लॉट विक्रीस बंदी
Spread the love निपाणी : निपाणी मुरगूड रस्त्यानजीक असणाऱ्या बाळूमामा नगर व बालाजी नगर मधील …