Tuesday , August 25 2026
Breaking News

क्रिडा

अचिंता शेउलीने रचला इतिहास! वेटलिफ्टिंगमध्ये मिळवले सुवर्णपदक

  बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अचिंता शेउलीने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. अचिंताने पहिल्या स्नॅच फेरीत 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये त्याने 139 किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. अशाप्रकारे …

Read More »

जेरेमी लालरिनुंगाची वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण भरारी!

  बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो असं एकूण 300 किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केलं. या स्पर्धेतील भारताचं हे दुसरं सुवर्णपदक आहे. महत्वाचं …

Read More »

भारत-पाकिस्तान आज ‘महामुकाबला’; कॉमनवेल्थ स्पर्धेत भिडणार

  एजबॅस्टन : भारतीय महिला क्रिकेट संघ आज (दि. 31) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला भिडणार आहे. एजबॅस्टन येथील मैदानावर हा रोमहर्षक सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाला कुठल्याही परिस्थितीत पहिला विजय नोंदवायचा आहे. खरेतर दोन्ही संघांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे …

Read More »

मीराबाई चानूची सुवर्ण कामगिरी

  भारताच्या खात्यात सुवर्णपदक, स्पर्धेतील पदकसंख्या तीनवर बर्मिंगहम: भारतीय वेटलिफ्टर्सची कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील जबरदस्त कामगिरी कायम असून आता दिग्गज वेटलिफ्टर मीराबाई चानू हीने सुवर्ण पदक भारताला मिळवून दिलं आहे. कॉमनवेल्थमध्ये आज एकाच दिवसातील भारताचं हे तिसरं पदक आहे. मीराबाईने 49 किलो वजनी गटात पदक मिळवलं आहे. एकूण 201 किलोग्राम वजन …

Read More »

पहिल्या टी20 सामन्यात भारताचा विंडीजवर दणदणीत विजय

  तारौबा : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका दि. २९ जुलै पासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने यजमानांचा ६८ धावांच्या फरकाने पराभव केला. त्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला १-० अशी आघाडी मिळाली …

Read More »

भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानला चारली धूळ, 5-0 ने मिळवला विजय

  कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंना मात 5-0 च्या फरकाने एक दमदार असा विजय मिळवला आहे. यावेळी पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या भारताने ही कामगिरी केली आहे. भारताच्या सर्वच बॅडमिंटनपटूंनी पाचही सामन्यात सरळ सेट्समध्ये विजय मिळवत पाकिस्तानला मात दिली. सर्वात आधी भारताच्या सुमीत रेड्डी आणि …

Read More »

शानदार उद्घाटन समारंभाने राष्ट्रकुल स्पर्धेचा शुभारंभ

  बर्मिंगहॅम : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात अलेक्झांडर स्टेडियमवर ११ दिवस चालणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धांना सुरुवात झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या उद्घाटन सोहळ्यात भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि भारतीय …

Read More »

भारताचा वेस्ट इंडीजवर 119 धावांनी मोठा विजय, 3-0 ने मालिका जिंकत दिला व्हाईट वॉश

  पोर्ट ऑफ स्पेन : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना भारताने तब्बल 119 धावांनी जिंकत मालिकाही 30 च्या फरकाने जिंकली आहे. विशेष म्हणजे 1983 पासून प्रथमच भारताने वेस्ट इंडीजला त्यांच्या मायभूमीत व्हाईट वॉश दिला आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी घेतली. तुफान फटकेबाजीनंतरही पावसाच्या व्यत्ययामुळे …

Read More »

भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का! नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

  नवी दिल्ली : बर्मिंगहममध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेआधी भारताच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाला गवसणी घालणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार नाही. काही दिवसांपूर्वीच जागतिक ऍथलेटिक्समध्ये रौप्य पदकाची कमाई करणारा नीरज दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची कामगिरी बर्‍याचदा चांगली …

Read More »

अक्षरचं संयमी अर्धशतक, संजू-श्रेयसची भागिदारी, भारतानं सर केला 312 धावांचा डोंगर, मालिकेतही विजयी आघाडी

पोर्ट ऑफ स्पेन : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने शानदार असा विजय मिळवला आहे. यावेळी वेस्ट इंडीजने दिलेल्या 312 धावांच्या तगड्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारताने दोन गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात भारताच्या युवा फलंदाजांनी शानदार कामगिरी केली. पण अक्षरने मोक्याच्या क्षणी ठोकलेल्या अर्धशतकाने सर्वांचीच …

Read More »