Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

‘त्या’ निराधार व्यक्तीला मिळाला आपुलकीचा आधार….

बेळगाव : धामणे रोड साईनगर येथे एक अनोळखी व्यक्ती निपचित पडून असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले होते. नागरिकांनी त्या व्यक्तीची माहिती शहापूर पोलिस ठाण्याला कळविली. शहापूर पोलीस ठाण्याच्या सुजाता वैलापुरकर यांनी घटनास्थळी जाऊन त्या व्यक्तीची माहिती घेतली. सदर व्यक्ती अन्नपाण्याविना भुकेलेली असल्यामुळे त्याची अवस्था दयनीय झाली होती. याकडे लक्ष देऊन सुजाता …

Read More »

आमदार अनिल बेनके पोहोचले थेट बांध्यावर

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी बेळगाव : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस झाल्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून दूबार पेरणीचे संकट देखील निर्माण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे बांध फोडून नाल्याचे पाणी थेट शेतात घुसल्याने नुकतेच शेतात मशागत करून भात रोपे तयार करण्यासाठी भाताची पेरणी केली होती …

Read More »

खानापूरात संततधार पाऊस, मलप्रभा नदी पात्रा बाहेर

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूरात पाचव्या दिवशीही सतत मुसळधार पावसाने खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी पात्रा बाहेर वाहत आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. सध्या परिस्थितीत मलप्रभा नदीचे पात्र धोक्यात असुन नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे.गेल्या काही दिवसापासून संततधार पावसाने तालुक्यात पाणीच पाणी करून सोडले आहे.गेल्या २४ तासात झालेल्या पावसाची नोंद कणकुंबी …

Read More »

वाहतूक पोलीसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

बेळगाव : दक्षिण वाहतूक पोलीसांना समाजसेविका माधुरी जाधव पाटील यांच्यावतीने मास्क व सॅनिटायझरचे शुक्रवारी सकाळी वाटप करण्यात आले.नेहमी रस्त्यावर थांबून जनतेची सेवा करणाऱ्या वाहतूक पोलिसांना सामान्य जनतेशी जास्तीत जास्त संपर्क येत असतो याची दक्षता म्हणून दक्षिणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक व सहाय्यक उपनिरीक्षक मंगला पाटील यांच्याकडे एन 95 मास्क व …

Read More »

शिवसेनेतर्फे सेव्ह वॅक्सिन डेपो मोहिम

बेळगाव : बेळगाव शहराला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या वॅक्सिन डेपोमध्ये वृक्षारोपण करत बेळगाव शिवसेनेच्या सेव्ह वॅक्सिन डेपो मोहिमेत सहभाग दर्शवला आहे. शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाचे आणि पर्यावरण दिन युवा सेना अध्यक्ष पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारी बेळगावातील शिवसैनिकांनी वॅक्सिन डेपोत वनमहोत्सव साजरा केला. भर पावसात वॅक्सिन …

Read More »

महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा निर्णय

बेंगळुरू : दरवर्षी उन्हाळ्यात महाराष्ट्राकडून कर्नाटकाला चार टीएमसी पाणी देण्याचा महत्वाचा निर्णय शनिवारी बंगळूर येथील बैठकीत झाला. पाणीवाटप, पूरनियंत्रण व जलाशयांमधील पाण्याचा विसर्ग या संदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. उन्हाळ्यात कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती …

Read More »

अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलची कर्नाटकने सुचना स्वीकारली; मंत्री जयंत पाटीलांची माहिती

बेंगळुरू : पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक राज्याचे पाण्याची आवक-जावक, पाणीसाठा याबाबतची अलमट्टीवर डायनॅमिकल कंट्रोलसाठी आधुनिक रियल टाईम डाटा यंत्रणा बसवावी, अशी सूचना महराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंगळूरमध्ये झालेल्या बैठकीत केली. ती त्यांनी मान्य केल्याची माहिती मंत्री पाटील यांनी तातडीने सोशल मिडियावर जाहिर केली आहे. संभाव्य पूरस्थितीवरील उपाययोजनांबाबत …

Read More »

जुमनाळला जुगार अड्ड्यावर छापा, सात जणांना अटक

जुमनाळ (ता.बेळगाव) : येथील जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई शुक्रवारी काकती पोलिसांनी केली आहे. सदर कारवाई दरम्यान 15 हजार 450 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.दुर्गाप्पा अंकलगी, फकीराप्पा नायक, लगमाण्णा नायक, बाळू नायक, सचिन पणगुती, बाकाप्पा माशानटी, लगमंना नायक अशी …

Read More »

ऐन पावसाळ्यात विद्यानगरात रस्ता, डुक्कराची समस्या

खानापूर (प्रतिनिधी) : सध्या खानापूरात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरातील रस्त्याची समस्या तसेच डुक्कराची समस्या येथील रहिवाशांना सतावत आहे.मात्र खानापूर नगरपंचायत तसेच नगरसेवक झोपेचे सोंग घेऊन दिवस काढत आहेत.कोणी म्हटले आहे की, झोपलेल्या जागे करता येईल, मात्र झोपचे सोंग घेतलेल्या नगरपंचायतीला जागे करणे महा कठीण झाले आहे. …

Read More »

गर्लगुंजीत जीसीबीने काढला गटरीतील कचरा

खानापूर (प्रतिनिधी) : यंदाच्या पहिल्याच पावसात गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावातील शिवाजी नगरात गटारीचे पाणी घरात शिरल्याने तारांबळ उडाली.गर्लगुंजी बेळगाव रस्त्यावरील शिवाजी नगरात रस्त्याचे काम करण्यात आले त्यामुळे गटारी मातीमुळे भरून गेल्या होत्या.पहिल्याच पावसात रस्त्याचे पाणी गटारीचे पाणी वाढल्याने घरात पाणी साचले.लागलीच ग्राम पंचायतीने जेसीबीच्या सहाय्याने गटारीतील गाळ, कचरा, माती बाजुला …

Read More »