Tuesday , March 3 2026
Breaking News

खानापूर

आकडी पोटात घुसून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; खानापूर तालुक्यातील घटना

  खानापूर : गवत आणण्यासाठी गेलेला शेतकरी गवताच्या गंजीवरून पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या हातातील आकडी पोटात घुसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना मोहिशेत (ता. खानापूर) येथे गुरुवारी सायंकाळी घडली आहे. कृष्णा गोविंद मिराशी (45) असे जीव गमावलेल्या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कृष्णा मिराशी अन्य शेतकऱ्यांसोबत …

Read More »

खानापूर तालुका म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजा शिवछत्रपती स्मारक येथे सकाळी ठीक ११ वाजता बोलावण्यात आलेली आहे. सदर बैठकीत १७ जानेवारी रोजी हुतात्मादिन पाळण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. तरी म. ए. समितीच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांनी वेळेत उपस्थित …

Read More »

जांबोटी विद्यालयाच्या वैभवात संगणक दालनाची भर; जांबोटकर प्रतिष्ठानचा उपक्रम

  जांबोटी (ता. खानापूर) : येथील विश्वभारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालयात संगणक दालनाचे उद्घाटन करण्यात आले. कै. किशोर गणपती जांबोटकर संस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या संगणक दालनाची उभारणी करण्यात आली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. शैक्षणिक विकासाबरोबरच सर्व सोयींनी युक्त असणाऱ्या जांबोटी …

Read More »

मराठा मंडळ शिक्षण संस्थेचा स्थापना दिन गौरवशाली परंपरेला उजाळा देत साजरा…..!

  खानापूर : ९५ वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षणदानातून बहुजन समाजाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेने सातत्यपूर्ण दिशा दिली आहे. मराठा मंडळ शिक्षण संस्था स्थापना दिन व बालिका दिन (क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती) यांचा संयुक्त सोहळा खानापूर येथे ताराराणी प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेच्या स्थापनेमागील वैचारिक अधिष्ठान, सामाजिक बांधिलकी आणि …

Read More »

तिवोलीवाडा क्रॉस ते रेल्वे ब्रीज रस्त्याचा प्रश्न आमदार विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्तक्षेपामुळे मार्गी; काम पुन्हा सुरू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील तिवोलीवाडा (ख्रिश्चन वाडा) ते रेल्वे ब्रीज या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामास काही दिवसांपासून अडथळा निर्माण झाला होता. रस्ता रुंदीकरण व कामादरम्यान दोन शेतकऱ्यांची शेतजमीन बाधित होत असल्याच्या तक्रारीमुळे रस्त्याचे काम तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आमदार श्री. विठ्ठलराव हलगेकर यांनी आज स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी …

Read More »

खानापूर, बेळगाव सीमावर्ती भागात हत्तींच्या कळपाचा संचार; सतर्कतेचा इशारा

  बेळगाव : खानापूर व बेळगाव तालुक्याच्या सीमावर्ती भागातील काही गावांमध्ये 8 ते 9 हत्तींचा कळप संचार करत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेच्या दृष्टीने उप वनसंरक्षण अधिकारी, बेळगाव विभाग यांच्या वतीने संबंधित गावांना तातडीचा इशारा देण्यात आला आहे. संबंधित गावे  बाकनुर, बेळवट्टी, बैलूर, कुसमळी, …

Read More »

युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांमुळेच गावातील शाळांचा विकास : रणजीत पाटील

  खानापूर : मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन देखील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवा उद्योजक आणि माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील शाळेच्या विकासासाठी पुढे येणे आवश्यक असून माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळांचा कायापालट झाल्यास गावातील सरकारी शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे. हलगा …

Read More »

जळगे मलप्रभा नदीकाठी ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग; १२०० टन ऊस भस्मसात

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १२०० टन ऊस भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत परिसरातील शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, …

Read More »

खानापूर पोलिस स्थानकाकडून गुन्हेगारांना अभय : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

  खानापूर : खानापूर पोलिस स्थानकात चाललेल्या गैरकारभारामुळे गुन्हेगारांना अभय तर सामान्य नागरिकांना त्रास अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. खानापूर पोलीस स्थानकात चालू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत ब्लॉक काँग्रेसकडे अनेक …

Read More »

मराठा समाजाच्या विकासासाठी मंजुनाथ भारती स्वामीजी आज खानापूरात मार्गदर्शन करणार!

  खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …

Read More »