Sunday , December 7 2025
Breaking News

संकेश्वर

चिक्कोडीत पावसाचा जोर! कृष्णेच्या पातळीत 5 फुटाने वाढ

चिक्कोडी : चिक्कोडी उपविभागातील चिक्कोडी, निपाणी, अथणी, कागवाड, रायबाग तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरूच आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने शुक्रवारी (ता. १८) देखील कृष्णा नदीवरील एक, दूधगंगेवरील चार व वेदगंगेवरील तीन असे आठही बंधारे पाण्याखालीच होते. पाऊस कायम असल्याने कृष्णेच्या पातळीत पाच तर दूधगंगा व वेदगंगा …

Read More »

गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवर झाड पडून आजी-नातू ठार

गडहिंग्लज : चालत्या दुचाकीवर झाड पडून आजीसह नातू जागीच ठार झाले. गडहिंग्लज-आजरा मार्गावर हॉटेस सूर्यासमोर आज (शुक्रवार) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या विषयी अधिक माहिती अशी की, गडहिंग्‍लज-आजरा मार्गावर चालत्‍या दुचाकीवरच झाड कोसळल्‍याने यामध्ये शांताबाई पांडुरंग जाधव (वय ७५, रा. लिंगनूर नूल, ता. गडहिंग्लज) व नातू …

Read More »

राज्यातील नेतृत्वात बदल होणार नाही : रमेश जारकीहोळी

बेळगाव : राज्यातील नेतृत्व बदल होणार नाही, येडियुराप्पा हेच मुख्यमंत्री राहणार असून 18 तारखेनंतर जनतेला नवे येडियुराप्पा दिसतील, असे वक्तव्य गोकाकचे आमदार व माजी जिल्हा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.गोकाक येथे खासदार मंगला अंगडी यांच्या कन्या श्रद्धा शेट्टर यांनी आज गुरुवारी आशा कार्यकर्त्यांना जीवनावश्यक साहित्याच्या किट्सचे वितरण केले. या कार्यक्रमात …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर

कोगनोळी : येथून जवळच असणाऱ्या दूधगंगा नदीचे पाणी पात्राच्या बाहेर पडले आहे. बुधवार तारीख 16 व गुरुवार तारीख 17 रोजी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे.दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या शेतीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारी पाण्यामध्ये बुडल्या …

Read More »

निपाणी, चिक्कोडीतील 7 बंधारे पाण्याखाली!

निपाणी (चिक्कोडी): गेल्या दोन दिवसांपासून चिक्कोडी उपविभागातील सर्व तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही धुव्वाधार पाऊस झाल्याने दूधगंगा, वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली असून कृष्णा नदीच्या पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १७) निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगेवरील ४ व वेदगंगेवरील ३ असे ७ बंधारे पाण्याखाली गेले …

Read More »

शनिवारी-रविवारी विकेंड लॉकडाऊन जाहीर

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शनिवार दि. १९ रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते सोमवार दि. २१ रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या कालावधीत जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सगळे व्यवहार बंद राहणार आहेत. सकाळी सहा …

Read More »

बेळगावात विहिंप-बजरंग दलातर्फे औषधी काढ्याचे वाटप

बेळगाव : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे कणेरीमठात बनविण्यात आलेल्या काढ्याचे बेळगावात विविध ठिकाणी वितरण करण्यात आले. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारी विविध प्रकारची औषधे वाटण्याचा उपक्रम …

Read More »

डिस्ट्रीक्ट बुक सेलर्स अँड स्टेशनरीज असोसिएशनने दिला 21 रोजी आंदोलनाचा इशारा

बेळगाव : शाळा-महाविद्यालयांसह बाजारपेठ सुरू होण्यातील अनिश्चिततेमुळे गेल्या दीड वर्षापासून पुस्तक विक्री आणि स्टेशनरी व्यवसायावर अत्यंत प्रतिकूल परिणाम झाला आहे. संबंधित दुकानदारांना मोठे नुकसान आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तेंव्हा येत्या सोमवार दि. 21 जून रोजी सरकारने घालून दिलेल्या वेळेत सरसकट सर्व दुकाने खुली करण्यास परवानगी दिली जावी अन्यथा …

Read More »

कर्नाटक मायग्रेशन देईना अन् महाराष्ट्र परीक्षेला बसू देईना!

प्रा. राजन चिकोडे यांचे पत्रक : सीमाभागातील विद्यार्थ्यांची कुचंबना निपाणी : शिक्षणासाठी परराज्यातून येणार्‍या विद्यार्थ्यांना स्थलांतर (मायग्रेशन) दाखला देणे बंधनकारक आहे. सीमाभागातील बहुसंख्य विद्यार्थी 10 वी नंतर महाराष्ट्र राज्यात शिक्षणासाठी जातात. पण स्थलांतर दाखला कधीच वेळत मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे सर्व दाखले वेळत …

Read More »

कोरोना सेंटरमध्ये रंगला भक्तीगीत भजनाचा नाद!

जोल्ले कोविड सेंटरमध्ये उपक्रम : इंद्रजीत देशमुखांची प्रेरणा निपाणी (संजय सुर्यवंशी) : ’माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या उक्तीप्रमाणे कोल्हापूर येथील माजी कार्यकारी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांच्या प्रेरणेतून समाजाला काहीतरी देणे लागतो, या उद्देशाने सध्याच्या परिस्थितीत कोरोनासारख्या रोगाला हटवण्यासाठी समाजातील वेगवेगळे घटक आपआपल्यापरिने मदत करीत आहेत. भजनाच्या माध्यमातून कोरोना रुग्णाचे आत्मबल …

Read More »