Friday , December 19 2025
Breaking News

कर्नाटक

चिक्कोडी येथे विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू

  चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी येथे विद्युत तारा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या एका व्यक्तीला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, चिक्कोडी येथे हेस्कॉमचे कर्मचारी विद्युत वाहिनी दुरुस्त करत असताना सिद्धराम नामक व्यक्तीला खांबावर चढवले असता त्याला विजेचा धक्का बसला आणि त्याचा …

Read More »

चित्रदुर्गजवळ भीषण अपघात : पाच जण ठार तर अन्य तिघे जखमी

  चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मल्लापूर गावाजवळ भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका मित्रासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संगनबसव(३६), खासगी बँकेत कर्मचारी, त्यांची पत्नी रेखा (२९), सात वर्षीय अगस्त्य, नातेवाईक भीमा शंकर आणि भीमाशंकर यांचा KGF मधील मित्र मधुसूदन …

Read More »

खानापूर ज्येष्ठ नागरिक संघटनेची बैठक सोमवारी

  खानापूर : कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना घटक खानापूर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी यांच्याकडून कळविण्यात येते की, सोमवार दिनांक 14 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी ठीक 11 वाजता संघाची मासिक बैठक बोलाविली आहे तरी सर्वांनी वेळेत उपस्थित राहून सहकार्य करावे. सभेचे विषय 1. मासिक कार्याचा आढावा 2. त्रैमासिक कार्याची …

Read More »

बंगळूर महानगरपालिका इमारतीत आग, ८ कर्मचारी जखमी

  बंगळूर : बंगळूर महानगरपालिकेच्या इमारतीत आज सायंकाळी भीषण आग लागली. या आगीत महानगरपालिकेतील ८ कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीत जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read More »

भोवी वडर अभिवृद्धी निगममध्ये बेळगाव जिल्ह्याला स्थान मिळावे

  राजेंद्र वडर; मंत्री शिवराज तंगडगी यांची घेतली भेट निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भोवी वडर अभिवृद्धी निगममध्ये आतापर्यंत उत्तर कर्नाटकला आणि बेळगांव जिल्ह्याला स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे या भागातील वडर भोवी समाजाचा विकास झालेला नाही. त्यासाठी आता भोवी अभिवृद्धी निगममध्ये बेळगांव जिल्ह्याला स्थान द्यावे, …

Read More »

महिला संघटनांनी जागृतीने काम करावे

  डॉ. स्नेहल पाटील : निपाणीतील हुतात्मा स्मारक येथे क्रांती दिन साजरा निपाणी (वार्ता) : प्रत्येक नागरिकाने देशासाठी योगदान दिले पाहिजे, आपले राष्ट्रीय कर्तव्य काय असते, आपण देशासाठी काय करु शकतो हे पाहिले पाहिजे. आसपासच्या परिसरात व देशात घडणाऱ्या प्रत्येक अप्रिय घटनांच्या संदर्भातदखल घेऊन त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे तरच खरे …

Read More »

शाळांच्या विकासासाठी शाळा सुधारणा कमिटीने पुढाकार घेणे आवश्यक : गोपाळ देसाई

  खानापूर : शाळांच्या विकासासाठी शाळा सुधारणा कमिटीने पुढाकार घेणे आवश्यक असून गावागावात बैठका घेऊन मराठी शाळांमध्ये विद्यार्थी वाढावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी केले आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने गुरुवारी खानापूर तालुक्यातील रामगुरवाडी, नागुर्डा, नागुर्डा वाडा, शेडेगाळी, हारुरी, ढोकेगाळी, …

Read More »

खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीवरील पुलाची आमदारांनी घेतली दखल, मंत्र्याशी केली चर्चा

  खानापूर : खानापूर तालुक्यातील खानापूर शहरालगत असलेल्या मलप्रभा नदीवरील पूल धोकादायक बनले आहे. या मलप्रभा नदीवर नव्याने पुल उभारणीसाठी भाजपचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी नुकताच दिल्ली येथे केंद्रीय अवजड रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खानापूर तालुक्यातील रस्त्या संदर्भात तसेच महामार्गावरील समस्येबाबत तसेच मलप्रभा नदीवरील …

Read More »

वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक

  खानापूर : खानापूर तालुक्यातील गोल्याळी वन विभागाअंतर्गत आवरोळी गावाच्या हद्दीत वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोमनिंग रवळप्पा कुडोळी (वय 50) व प्रभू सध्दाप्पा कुडोळी (वय 38) यांना अटक करून या दोघांची रवानगी कारागृहात करण्यात आली. बेळगाव विभाग उपवन संरक्षण अधिकारी कल्लोळकर तसेच नागरगाळी उपविभाग सहाय्यक …

Read More »

खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या बदलीचा परिणाम; विद्यार्थी गेले बाहेर, स्वयंपाकीला केले कमी

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ विस्ताराने मोठे त्यातच जंगलाने व्यापलेला तालुका असल्याने नुकताच खानापूर तालुक्यातील प्राथमिक शाळातील शिक्षकांच्या तालुका बाहेर व अतंर्गत तालुक्यात झालेल्या बदल्यामुळे तालुक्यातील जवळपास ३० शाळातून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने पालकांनी विद्यार्थ्याचे भवितव्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलविण्याने विद्यार्थ्याची संख्या कमी …

Read More »