Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

कोगनोळीत आरोग्य शिबिरात 166 रुग्णांची तपासणी

कोगनोळी : येथील प्रजावणी फाऊंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी नारायण बिरू कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावणी फाऊंडेशन व सिद्धगिरी हॉस्पिटल कणेरी यांच्या संयुक्त विद्यमानाने धनगर समाज सामुदायिक भवन येथे सर्व आजारावरील आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. शिबिरात, कोगनोळी पंचक्रोशीतील 166 नागरिकांनी सहभागी होऊन तपासणी करुन घेतली. अरुण पाटील यांनी स्वागत …

Read More »

चांगल्या गुणांचा वापर समाजासाठी करावा

इस्माईल पटेल : निपाणी रोटरी, इनरव्हीलचा पदग्रहण सोहळा निपाणी : रोटरी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्था समाजासाठी निरंतरपणे कार्यरत आहे. समाजसेवा हेच या संस्थेचे ध्येय आहे. आयुष्यात अनेक अडचणी येत असतात त्यांचा सामना करत निश्चित ध्येय गाठणे आवश्यक आहे. याबरोबरच आपल्या अंगातील चांगले गुण आणि सवयी हेरून त्याचा समाजासाठी वापर करावा, …

Read More »

’रवळनाथ’मुळेच सीमावासियांची घरबांधणीची अडचण दूर

प्राचार्य डॉ. कोथळे : सभासद, यशवंत पाल्यांचा गौरव निपाणी : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या सहज, सुलभ व कमी व्याजदरातील अर्थसहाय्यामुळेच सीमाभागातील रहिवाश्यांची घरबांधणीची अडचण दूर झाली आहे, असे मत प्राचार्य डॉ. एम. बी. कोथळे यांनी व्यक्त केले. श्री रवळनाथ हौसिंग फायनान्सतर्फे आयोजित वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या आणि विविध …

Read More »

बेंगळूरमध्ये आणखी एक स्फोट; 3 जणांचा जागीच मृत्यू

बेंगळूर : गुरूवारी दुपारी बेंगळुरूच्या ट्रान्सपोर्ट कार्यालयात फटाके साठवलेल्या दुकानात स्फोट झाल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. ही घटना रात्री 11.45 च्या सुमारास टायर पंक्चर दुकानात घडली. या स्फोटामुळे दुकानाजवळ उभ्या असलेल्या सुमारे 10 मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. फयाज (वय 50), मनोहर (वय 29) आणि …

Read More »

गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेकडून २ लाखाची देणगी सुपूर्द

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी संस्थेच्या मुख्याधिकारी विरेंद्र हेगदे यांच्या सुचनेवरून गर्लगुंजी लक्ष्मी मंदिर जीर्णोद्धारासाठी दोन लाख रूपयाचा धनादेश खानापूर श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृध्दी योजनेचे अधिकारी प्रदिप शेट्टी, संदिप नाईक, सदानंद आर यांच्याकडून श्री …

Read More »

गांजा विक्री करणार्‍या दोघांना अटक

दीड किलो गांजा जप्त : यरनाळ जवळ कारवाई निपाणी : गांजा विक्रीसाठी नेणार्‍या दोघांना निपाणी पोलिसांनी बुधवारी अटक केली. सोहेल शब्बीर देसाई (वय 26, रा. बादलवाले प्लॉट, निपाणी), हमीद सलीम शेख (वय 21, रा. शिवाजीनगर, निपाणी) अशी अटक केलेल्या संशयितांची नांवे आहेत. संशयितांकडून पोलिसांनी दीड किलो गांजा व मुद्देमाल जप्त …

Read More »

जांबोटी -चोर्ला रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, अपघाताला आमंत्रण

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील जांबोटीपासून चोर्लापर्यंतच्या महामार्गावर यंदाच्या मुसळधार पावसामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे जांबोटीपासून ते चोर्लापर्यंत जाणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनांना वाहन चालविणे तारेवरची कसरत होत आहे. अशातच खड्डा चुकविण्याच्या नादात अपघाताला निमंत्रण होत आहे. त्यामुळे या मार्गावर वाहने चालविणे धोक्याचे झाले आहे. मागील वेळी माती टाकून खड्डे …

Read More »

कोगनोळी येथील रयत संघटनेच्या शेतकर्‍यांचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

पोलिसांची मध्यस्ती : अधिकारी शेतकरी यांच्यात होणार बैठक कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे रस्ता रुंदीकरण होणार आहे. त्याचबरोबर कोगनोळी येथील फाट्यावर उड्डाणपूल होणार आहे. या उड्डाणपुलामध्ये येथील शेतकर्‍यांची सुपीक जमीन जाणार आहे. येथील शेतकर्‍यांनी येथील उड्डाणपूल व अतिरिक्त जमीन संपादनाला विरोध दर्शवला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी …

Read More »

कोगनोळी येथे बुधवारी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

कोगनोळी : येथील प्रजावाणी फाऊंडेशनचे संस्थापक स्वर्गीय नारायण कोळेकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रजावाणी फाऊंडेशन व सिद्धगिरी चारिटेबल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन धनगर समाज भवन येथे बुधवार तारीख 22 रोजी सकाळी दहा वाजता केले असल्याची माहिती प्रजावाणी फाऊंडेशनचे विठ्ठल मुरारी कोळेकर व सचिन परीट यांनी दिली. …

Read More »

सोयाबीनचा दर घसरल्याने शेतकर्‍यांची निराशा

निपाणी : शहर आणि ग्रामीण परिसरातील सोयाबीन पिकाला विक्रम दर मिळत असलेल्या शेतकरी वर्गाला एका रात्रीत व्यापारी वर्गाने झटका दिला. प्रति किलो 85 रूपयांपर्यत असणारा दर 50 रूपये किलोवर आल्याने शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी व्यक्त होत आहे. एका रात्रीत तब्बल 28 ते 30 रूपये …

Read More »