बेंगळुर : युक्रेनमध्ये आज रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. नवीन शेखरप्पा (वय 21) असे त्याचे नाव असून तो कर्नाटकमधील हावेरी जिल्ह्यातील राणीबेन्नूर तालुक्यातील चेळगिरी गावचा आहे. तो खारकीव येथे शिक्षणासाठी गेला होता. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज सकाळी खार्किवमध्ये …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त मलप्रभा नदी घाटावर भाविकांची गर्दी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील मलप्रभा नदी घाटावर खानापूर, बेळगाव तालुक्यातील भाविकांनी मंगळवारी दि. 1 मार्च रोजी महाशिवारात्रीच्या निमित्ताने स्नानासाठी एकच गर्दी केली होती. सकाळी आठ वाजल्यापासून मलप्रभा नदी घाटावर स्नान करून मलप्रभा नदीची पुजा, नैवेद्य दाखवून मनोभावे पुजा करत होते. यावेळी मलप्रभा नदी काठावर नैवेद्य व महाप्रसादासाठी स्वयंपाकाचे आयोजन …
Read More »लसीकरणाची गरज शासनालाच?
दुसर्या डोससह बुस्टर डोसला नकारघंटा कायम : केवळ 1756 बुस्टर डोस पूर्ण निपाणी (वार्ता) : तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याची गरज केवळ शासनाला असल्याचे विदारक चित्र सध्या निपाणी तालुका पाहण्यास मिळत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असताना नागरिकांकडून दुसर्या डोससह बुस्टर डोस घेण्यास नकार घंटा असल्याचे चित्र …
Read More »’देवचंद’ मध्ये विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ
टॅलेंट सर्च परीक्षेचा निकाल : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता): देवचंद महाविद्यालयापासून सुरु होणार्या इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत प्रविष्ट झालेल्या कला शाखेतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ आणि गुणगौरव समारंभ झाला. यावेळी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. प्रशांत शाह यांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्राप्त डी.टी.एस.( देवचंद टॅलेंट सर्च) परीक्षा शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील विद्यार्थ्यांना …
Read More »खानापूर आरोग्याधिकार्याचे बनावट शिक्के, सही वापरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर सरकारी दवाखान्यात आरोग्य अधिकार्याचे बनावट शिक्के व सही वापरून संध्या सुरक्षा पेन्शन योजनेचा लाभ देणार्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गजाआड केले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वासु गुरव रा. मेंडेगाळी ता. खानापूर व सरकारी दवाखान्यातील कर्मचारी इस्माईल बिडीकर यांनी मिळून हे कृत्य केले आहे. या …
Read More »जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञानची भुमिका महत्त्वाची : सरोज पाटील
कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान सोहळा निपाणी (वार्ता) : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. विज्ञानामुळे आपली जीवनशैली अधिक सुखकर झाली. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. विज्ञानाने अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. विज्ञान व जीवन या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात …
Read More »अंकले रस्ता प्राथमिक शाळेला गोदाबाई फौंडेशनतर्फे १ लाख २० रुपयांचे साहित्य
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर- अंकले रस्ता प्राथमिक शाळेला श्रीमती गोदाबाई कर्निंग मेमोरियल फौंडेशनतर्फे दोन तिजोरी, २० डेस्क, ३ ग्रिनबोर्ड, १ वाॅटर फिल्टर असे १ लाख २० हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सरकारी प्राथमिक शाळा वाचविण्यासाठी आता देणगीदारांनी पुढे येण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. येथील अंकले रस्ता कन्नड उच्च …
Read More »कणगला बैलगाडी शर्यतीत तासगांवचे प्रमोद थोरात यांची बैलजोडी प्रथम
संकेश्वर (प्रतिनिधी) : कणगला श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त करजगा रस्त्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यत पहाण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. येथील दुबैलगाडी शर्यतीत सात दुबैलगाडी सहभागी झाल्या होत्या. सात किलोमीटरचे अंतर फर्लांगभर अंतराने पार करीत तासगांवचे प्रमोद थोरात यांच्या बैलजोडींने प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकाविले. दुसऱ्या क्रमांकावर अथनीच्या शंकर …
Read More »संकेश्वरात श्री सिध्दी ट्रेडर्सचे थाटात उद्घघाटन
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-हुक्केरी रस्ता येथे नव्याने प्रारंभ करण्यात आलेल्या श्री सिध्दी ट्रेडर्सचे उदघाटन उद्योजक अप्पासाहेब शिरकोळी, युवानेते पवन कत्ती यांचे हस्ते फित सोडून करण्यात आला. यावेळी बोलताना पवन कत्ती म्हणाले, श्री सिध्दी ट्रेडर्सने सर्व प्रकारचे लेटेस्ट टाईल्स, मार्बल, ग्रॅनाईट, सिरॅमिक उपलब्ध करुन नव्याने घर बांधणाऱ्या लोकांची उत्तम सोय केली …
Read More »समिती सोडून गेलेल्यांचा विचार न करता मराठीसाठी लढा तीव्र करुया : रणजीत पाटील
खानापूर : जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व मध्यवर्ती समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta