Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल

बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्‍या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे. या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्‍या प्रवाशांना …

Read More »

शाळातील सभा-समारंभांवर बंदी, विवाहात 500 लोकांची मर्यादा

नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी …

Read More »

कणकुंबी नाक्यावर विनापरवाना 7 लाखाचा मद्यसाठा जप्त

बेळगाव : गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करताना अबकारी खात्याने धाड घालून मुद्देमालासह 7,75,193 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी कणकुंबी येथे करण्यात आली. दत्तात्रेय हनुमंत खानापुरे रा. वड्डर छावणी खासबाग बेळगाव असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. हा केए 22 डी. 5685 या …

Read More »

शालेय मुलांच्या मदतीला धावून जाणारे रमेश कत्ती!

संकेश्वर (प्रतिनिधी) : माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती हे हुक्केरी विश्वनाथ भवन येथील कार्यक्रमाला निघाले असता हुक्केरी बायपास रस्त्यावर विवेकानंद शाळेची बस रस्त्याच्या कडेला सिक्ड होऊन थांबलेली दिसताच रमेश कत्ती शालेय मुलांच्या मदतीला धावून गेले. शाळेची बस रस्त्या शेजारच्या खड्ड्यात उतरल्याने त्यांनी प्रथम बसमधील मुलांना सुखरुप खाली …

Read More »

हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी

बेळगाव : हलशीवाडी येथील युवा स्पोर्ट्स आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी सकाळी 10.30 वाजता पार पडणार आहे. स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळत असून इच्छुक संघांनी आपली नावे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील यांच्या …

Read More »

लखन जारकीहोळी निवडून येणारच!

युवा नेते उत्तम पाटील यांची स्पष्टोक्ती : लखन जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ तवंदीत सभा निपाणी : निवडणुका आल्या की कार्यकर्त्यांना हात जोडून चालत नाही. आपण कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याबरोबरच केवळ राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर न करता त्यांना बँक, सुतगिरणी, साखर कारखाना, गारमेंट सुरु करुन रोजगार मिळवून दिला जात आहे. हे सर्व करत असताना …

Read More »

सेवाभावी संस्थामुळेच महिला आघाडीवर

आरोग्य अधिकारी दिलीप पवार : मानकापूर येथे ज्ञान विकास केंद्राचा वर्धापन निपाणी : पूर्वी महिला फक्त चूल आणि मूल सांभाळत होते. पण यातून बाहेर येऊन त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेल्या अनेक दशकापासून अनेक सेवाभावी संस्था पुढाकार घेत आहेत. धर्मास्थळ ग्राम अभिवृद्धी संस्थाकडून महिलांच्या आर्थिक उन्नती बरोबरच त्यांच्या मानसिकतेत …

Read More »

साखर आयुक्त कार्यालयावर रयत संघटनेचा धडक मोर्चा

राजू पोवार यांचा पुढाकार : विविध मागण्यांचे दिले निवेदन निपाणी : कर्नाटक राज्य रयत संघटनेने जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या मनमानी विरोधात साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. अनेक कारखाना एफआरपी रक्कम देण्यात विलंब करत आहेत. अनेकांची मागील वर्षीची थकबाकी अद्याप बाकी आहे. यावरुन रयत संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या …

Read More »

अवकाळीमुळे कारखान्यांचा पाय खोलात

शेतकर्‍यांसमोर अतिरिक्त ऊसाचे संकट : उभ्या ऊसाची टांगती तलवार निपाणी : दोन-तीन वर्षांपासून पुरेसा पाऊस आणि ऊसाचे दर वाढल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हंगामात ऊसाची लागवड केली आहे. सीमाभागातील यावर्षीच्या कार्यक्षेत्रातील सर्वच साखर कारखान्यांकडे तब्बल 30 हजार हेक्टरची विक्रमी नोंद झालेली आहे. तर अवकाळी पडणार्‍या पावसामुळे व यंदा अतिरिक्त ऊसाचा प्रश्न …

Read More »

नायकोल शिवारात गविरेड्याकडून भात पिकांचे प्रचंड नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : नायकोल (ता. खानापूर) गावाच्या शिवारात हातातोंडाशी आलेल्या भात पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे. माणिकवाडी गावचे शेतकरी आपाणा गावडा यांची नायकोल गावाशेजारी असलेल्या भात पिकांत गविरेड्याच्या कळपाने घुसून प्रचंड नुकसान केले आहे. गेल्या पंधरा दिवसापासुन सुगीच्या हंगामात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. …

Read More »