Tuesday , June 2 2026
Breaking News

कर्नाटक

अक्कोळ मधील डॉ. संजय पंतबाळेकुंद्री जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

  निपाणी (वार्ता) : श्रीपंत भक्त मंडळ भुदरगड, राधानगरी, कापशी विभागातर्फे गारगोटी येथे गुरुबंधू व भगिनींचा महामेळावा रविवारी (ता.३) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गुरुवर्य डॉ.श्री संजय अरुण पंतबाळेकुंद्री (अक्कोळ) यांना ‘जीवन गौरव पुरस्कार- २०२३ ‘ देवून गौरवण्यात आले. लोकसेवेचा अखंड ध्यास घेऊन वैद्यकीय सेवेतून प्रामाणिक, निस्वार्थी सेवा व …

Read More »

चित्रदुर्गजवळ भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

  चित्रदुर्ग : चित्रदुर्ग येथे उभ्या असलेल्या लॉरीला कारची धडक बसून झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये असलेले शमशुद्दीन (40), मल्लिका (37), खलील (42) आणि तबरेज (13) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे तुमकूर येथील असल्याची माहिती आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना …

Read More »

माध्यमिक शिक्षक संघातर्फे तिघांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

  निपाणी (वार्ता) : शिक्षक दिनानिमित्त बंगळूर मधील कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघ संघाच्या निपाणी तालुका विभागातर्फे निपाणी तालुक्यातील तीन शिक्षकांना सर्वोत्तम आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी (ता.५) येथे आयोजित शिक्षक दिन कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. चांद शिरदवाड येथील सरकारी हायस्कूल मधील …

Read More »

व्हीएसएम हायस्कूलमध्ये रोटरी क्लबतर्फे किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : येथील रोटरी क्लबतर्फे एमएचएम अंतर्गत येथील विद्या संवर्धक संचलित व्हीएसएम हायस्कूल मध्ये सहावी ते दहावी पर्यंतच्या किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’या उपक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कोल्हापूरच्या स्त्रीरोग तज्ञ रोटेरीयन डाॅ. मीरा कुलकर्णी यांनी, सोप्या भाषेत आहार, शारीरिक स्वच्छता, मासीकपाळी व्यवस्थापन, मोबाईल वापराचे फायदे, तोटे या …

Read More »

खानापूरात तालुका अधिकाऱ्यांनी वर्तणुकीचा कळस गाठला

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या नगरपंचायतीचे चीफ ऑफिसर आर. के. वटारे हे अधिकारी म्हणून नगरपंचायतीवर हजर झाले. तेव्हापासून त्यांनी आपल्या वर्तणुकीचा प्रताप सुरू केला. खानापूर शहराच्या उपनगरातील वाजपेयी नगरात वाजपेयी यांच्या नावाचा फलक स्वत: उपटून काढला. तेव्हापासून ते चर्चेत आले आहे. त्यापाठोपाठ नगरपंचायतींच्या स्वच्छता कामगाराचा तीन महिन्याचा पगार देऊ …

Read More »

दुर्गा वाहिनीचे पोलिसासमवेत रक्षाबंधन

    कामकाजाची घेतली माहिती; समाधी मठ शाळेतही बांधल्या राख्या निपाणी (वार्ता) : विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीच्या निपाणी विभागाच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये उपनिरीक्षक शिवराज नाईक व कर्मचाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी पोलिसांना गोड धोड खायलाही घातले. तसेच दुर्गा वाहिनीच्या युवतीसह महिलांनी पोलीस …

Read More »

संगीता चिक्कमठ यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी!

  निपाणी (वार्ता) : येथील राम नगरात वास्तव्यास असलेल्या अंजना कांबळे आणि वडील बाबासाहेब कांबळे यांच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांची कन्या व चिकोडी येथील कर्नाटक स्टेट एक्साईज कार्यालयातील कर्मचारी असलेल्या संगीता शिवानंद चिक्कमठ यांनी येथील बसव गोपाळ अनाथ आश्रमातील गरजू ३५ मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जोपासली …

Read More »

श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा

    निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. वेंकटेश्वरा कॉलेजमध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या. चिकोडी उपनिर्देशक, शाळा शिक्षण (पदवी पूर्व) व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने या स्पर्धा घेण्यात आल्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा संयोजक अजय मोने, …

Read More »

सरकार पडेल हा भाजपचा भ्रम

  संतोष यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसच्या तीव्र प्रतिक्रीया बंगळूर : कॉंग्रेसचे ४५ आमदार आपल्या संपर्कात असल्याच्या भाजपचे संघटना सचिव बी. एल. संतोष यांच्या वक्तव्यावर कॉंग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटले. राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळेल अशा भ्रमात भाजप असल्याची टीका करून संतोष यांचे हे स्वप्न साकार होणार नसल्याच्या प्रतिक्रीया कॉंग्रेस नेत्यांनी व्यक्त केल्या. उपमुख्यमंत्री …

Read More »

विरोधकांच्या एकजुटीची भाजपला भीती

  मुख्यमंत्री सिध्दरामय्या, मोदींच्या योगदानावर प्रश्न बंगळूर : विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या मंत्रामुळे केंद्रातील भाजप सरकार हादरायला लागले आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ट्विटच्या मालिकेद्वारे फटकारले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कुशासनाचा अंत करण्याच्या दिशेने मुंबईत झालेल्या भारत आघाडीच्या तिसर्‍या महत्त्वाच्या बैठकीने एक मोठे पाऊल उचलले. आघाडीचे नेतृत्व प्रभावीपणे …

Read More »