Wednesday , March 11 2026
Breaking News

विद्यानगरात रस्ता, गटारीचा पत्ताच नाही

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात गेल्या कित्येक वर्षांपासून रस्ता आणि गटारीचा पत्ताच नाही. त्यामुळे विद्यानगरातील रहिवासीना पावसाळ्यात रस्त्याअभावी चिखलाशी संघर्ष करावा लागतो. गटारी नसल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. तर त्यामुळे रस्त्याची दुर्दशा झाली आहे.
या दोन्हीही समस्या या भागातील नागरिकांना सतत सतावत आहेत.
या भागाचे नगरसेवक सतत या भागात ये-जा करतात मात्र त्याच्या दृष्टीस याभागातील रस्ता, गटारी कधी पडणार? आणि रस्त्याचे काम कधी होणार या विवेचनात या विद्यानगरातील नागरिक आहेत.
तेव्हा खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विवेक बन्ने यांनी विद्यानगरातील रहिवासीच्या समस्या जाणून घेणे अतिमहत्वाचे आहे. यासाठी विद्यानगरातील रस्ता आणि गटारीची पाहणी करून विद्यानगरातील रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा. अशी मागणी विद्यानगरातील रहिवाशांतून होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर तालुक्यातील माचाळी येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली

Spread the love  खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *