Tuesday , March 3 2026
Breaking News

केंद्राबरोबर चर्चेसाठी संयुक्त किसान मोर्चाची समिती

Spread the love

नवी दिल्ली : केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. तसेच जोपर्यंत देशभरात विविध ठिकाणी या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकर्‍यांवरील गुन्हे मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरुच राहिल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
आंदोलनाचे पुढील धोरण ठरविण्यासाठी तसेच केंद्र सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. यामध्ये बलबीर सिंह राजेवाल, गुरुनाम चढूनी, युद्धवीर सिंह, शिवकुमार कुक्का, अशोक धावले यांचा समावेश आहे. याप्रश्नी 7 डिसेंबर रोजी संयुक्त किसान मोर्चाची पुन्हा बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. संसदेमध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदे म्हटलं होते की, देशभरात शेतकरी आंदोलन काळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी आंदोलकांची माहिती नाही.
मागील वर्षभरात शेतकरी आंदोलनावेळी देशभरात 702 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनात मृत झालेल्या शेतकर्‍यांची यादी संयुक्त कृषी सचिवांना पाठवली आहे. या सर्व शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

लग्नाला जाताना काळाचा घाला! वऱ्हाडींची बस दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू

Spread the love  उत्तराखंड : नेपाळ सीमेजवळ भयंकर रस्ते अपघात झाला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडींची बस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *