Saturday , March 7 2026
Breaking News

Belgaum Varta

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी साजरी

  बेळगाव : नेहमी कडक शिस्तीत कवायत करत असलेले, नेमबाजीचा सराव करणारे सैनिक आज दहीहंडी खेळताना पाहायला मिळाले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण आणि दहीहंडी अपूर्व उत्साहात भक्तीभावाने साजरा करण्यात आला. मिलिटरी महादेव मंदिर येथे मध्यरात्री देवकीनंदन भगवान श्री कृष्णाच्या जन्म सोहळ्याने या उत्सवाची सुरुवात झाली. त्या …

Read More »

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला

  मालवण : नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मालवण येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. तेव्हा मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला आहे. पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे अद्याप अस्पष्ट आहे. नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं कौतुक …

Read More »

“बेळगावच्या एकदंत”चा मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात पार

  बेळगाव : सार्वजनिक श्री गणेशोत्सव श्री एकदंत युवक मंडळाच्या वतीने सोमवार दिनांक 26/8/24 रोजी सकाळी मुहूर्तमेढ करण्यात आले. ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसेच गरजूंना आर्थिक मदत करून मंडळ हे आपल्या समाजासाठी कायतरी देणं लागत यासाठीच हे सर्व उपक्रम राबवणार आहोत असे मंडळाचे अध्यक्ष नागेश गावडे …

Read More »

निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार विशाल पाटील यांची भेट

  निपाणी (वार्ता) : सांगली येथील खासदार विशाल पाटील यांची निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान सीमा प्रश्नसंदर्भात चर्चा करण्यात आली. समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सीमाप्रश्न १९५६ पासून ताटकळत आहे, तो सुटावा म्हणून निवेदन देण्यात आले.सन २००४ पासून प्रलंबित असलेला …

Read More »

श्रीराम सेना गोकाक तालुका प्रमुखावर चाकूहल्ला

  बेळगाव : श्रीराम सेनेचे जिल्हा मुख्य सचिव आणि गोकाक तालुकाप्रमुख रवी पुजारी (वय २७) यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. त्यांच्यावर गोकाक शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोकाक शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. रवी पुजारी हे दोन दिवसांपूर्वी गोकाक शहरातील एका ढाब्यावर जेवणासाठी गेले होते. जेवण करत असताना त्या …

Read More »

पडलेल्या भिंतीचे ढिगारे हटवण्याची मागणी

  बेळगाव : पावसामुळे शेजारच्या घराची भिंत आमच्या ये-जा करण्याच्या वाटेत पडल्याने अडथळा निर्माण झाला आहे. हा अडथळा दूर करून जीर्ण इमारतीचा धोकादायक भाग पाडून द्यावा, अशी मागणी गोंधळी गल्लीतील रहिवासी व निवृत्त शिक्षिका शशिकला नेवगी यांनी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली आहे. इमारत १०० वर्षे जुनी असून त्यात …

Read More »

जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

  सभासदांना 15% लाभांश जाहीर बेळगाव : जय जनकल्याण सौहार्द सहकारी नियमित, मण्णूर या संस्थेची 7 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली, प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन संस्थापक एल. के. कालकुंद्री सर यांच्या हस्ते संपन्न झाले, तसेच सरस्वती फोटो पूजन चेअरमन लक्ष्मण मंडोळकर व व्हा. चेअरमन संदीप कदम …

Read More »

वडगाव-यरमाळ रस्त्यावर बसफेऱ्या वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी

  बेळगाव : वडगावपासून बळ्ळारी नाला अलिकडे व वडगाव पलिकडे शहापूर, वडगाव, धामणे, येळ्ळूर, मासगौंडहट्टी अशी हजारो एकर कृषी जमीन आहे. वडगाव, शहापूर शिवारातील शेतजमीन हि शहरी भागातील शेतकऱ्यांची आहे. तिथे बारमाही शेतकरी व महिला शेतीत जात असतात. कारण बळ्ळारी नाल्यापूढे जवळपास 800/850 एकर यरमाळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला शहापूर शिवार …

Read More »

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत श्रीपेवाडीचा पारितोष पाटील प्रथम

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थी सोमशेखर कानडे यांनी आपल्या आई भारती अनिल कानडे यांच्या स्मरणार्थ नूतन मराठी शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल मधील विद्यार्थी पारितोष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. अध्यक्षस्थानी …

Read More »

विद्यार्थ्याकडून स्वयंम अध्ययन करून घेणे गरजेचे

  प्रा. तुकाराम गडकरी : ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेने सहकाराबरोबरच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. औद्योगिक क्रांतीतून रोजगार निर्मिती झाली. पण आता आयटी क्रांतीमुळे रोजगार जात आहेत. त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार शिक्षण देणे आवश्यक आहे. …

Read More »