Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

छात्रसेनेमुळे वैयक्तीक गुणांचा विकास

  सागर माने ; ‘देवचंद’ मध्ये छात्रसेना दिन निपाणी (वार्ता) : छात्रसेना तरुणांची जगातील सर्वात मोठी संघटना आहे. राष्ट्र बांधणीमध्ये छात्र सेनेचे मोठे योगदान आहे. छात्र सेनेमार्फत राष्ट्रीय एकात्मता, जाज्वल्य देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण रक्षण इत्यादी सामाजिक जाणीवा प्रगल्भ होतात, असे मत छात्र सैनिक सागर माने यांनी व्यक्त केले. अर्जुननगर …

Read More »

उत्तम पाटील यांच्यामुळे सहकार रत्न पुरस्काराची वाढली उंची

  शरद पवार :उत्तम पाटील यांचा सन्मान निपाणी (वार्ता) : रावसाहेब यांना यापूर्वी कर्नाटक शासनाकडून सहकाररत्न पुरस्कार मिळाला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम पाटील हे सुद्धा सामाजिक, राजकीय क्षेत्राबरोबर सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने शासनाकडून कर्नाटक शासनाकडून त्यांनाही सहकारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने खऱ्या अर्थाने या पुरस्काराची उंची …

Read More »

गरम कपड्यांचा व्यवसाय थंडच!

  ग्राहकांच्या प्रतीक्षेत विक्रेते : थंडीअभावी व्यवसायावर परिणाम निपाणी (वार्ता) : नोव्हेंबर महिन्याचा पंधरवडा संपूनही अद्याप थंडी वाढलेली नाही. त्यामुळे निपाणी शहरातील गरम कपड्यांच्या बाजारात ग्राहकांची वर्दळ सध्या कमी दिसून येत आहे. त्यामुळे अशोकनगर, जुना पीबी रोड, साखरवाडी, बेळगाव नाका परिसरात असलेल्या गरम कपड्यांच्या स्टॉलवर सन्नाटा पसरल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर …

Read More »

तब्बल दोन महिन्यानंतर निपाणीत पाऊस

  दिवसभर ढगाळ वातावरण : पाऊस येताच वीज गायब निपाणी (वार्ता) : सलग दोन महिने पावसाने दडी मारली होती. त्यामुळे गेल्या महिन्यापासून उष्म्याध्ये वाढ झाली होती. अखेर मंगळवारी (ता.२८) दुपारी साडेबारा वाजता सुमारास निपाणी शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र पावसाला सुरुवात होताच वीज गायब झाल्याने …

Read More »

महामेळावा यशस्वी करणारच : खानापूर तालुका समितीच्या बैठकीत निर्णय

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची आज महत्वाची बैठक सोमवार दिनांक २७/११/२०२३ रोजी संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी म. ए. समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई होते. यावेळी कर्नाटक सरकारने बेळगांव येथे ४ डिसेंबर २०२३ रोजी होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात मध्यवर्ती म. ए. समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे खानापूर तालुका म. …

Read More »

रस्ता रुंदीकरणातील मारुती मंदिराला २० लाखाची भरपाई

  निपाणी (वार्ता) : येथील जुन्या पीबी रोडच्या रुंदीकरणांमध्ये साखरवाडी मधील प्राचीन मारुती मंदिर पाडण्यात आले होते. त्याचे नुकसान भरपाई मिळावी म्हणून मंदिर कमिटीने नगरपालिकेसह विविध अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. बऱ्याच वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर नगरपालिकेतर्फे २० लाखाची भरपाई देण्यात आली. त्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल माजी आमदार काकासाहेब पाटील यांचा मारुती मंदिर …

Read More »

कार्तिक स्वामी दर्शन सोहळ्यास भाविकांची गर्दी

  दीपोत्सवासह इतर कार्यक्रम निपाणी (वार्ता) : येथील आश्रयनगरमधील कार्तिकेश्वर मंदिरात कार्तिकेश्वर स्वामी दर्शन सोहळा पार पडला. दर्शनासाठी भाविकांनी दिवसभर गर्दी केली दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी कार्तिकेश्वर मंदिरात बाबुराव महाजन महाराजांच्या उपस्थितीत राहुल भाटले, सचिन डांगरे, पिंटू पठाडे, स्वप्निल खोत, अजय आंबोले, संतोष पाटील, विश्वनाथ शेंडगे याच्या उपस्थितीत …

Read More »

कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे नवीन वास्तुत स्थलांतर

  निपाणी (वार्ता) : कॅनरा बँकेच्या निपाणी शाखेचे अशोकनगर येथील नव्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याचे उद्घाटन येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. निपाणी येथील व्यवस्थापक श्रीकांत यांनी स्वागत केले. चंद्रकांत कोठीवाले यांनी, चांगली सेवा दिल्यास …

Read More »

ऊस, सोयाबीन, कापूस दरासाठी विधानसभेवर मोर्चा

  राजू पोवार ; यादगिरी येथे जनजागृती बैठक निपाणी (वार्ता) : यादगिरी, रायचूर, विजापूर, बागलकोट जिल्ह्यामध्ये उस, सोयाबीन आणि कापसाचे मोठे उत्पादन घेतले जाते. पण दरवर्षी या शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्याकडे वळत आहेत. त्यामुळे यापुढील काळात वरील पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, या …

Read More »

साहित्य संमेलनातून माणसे जपण्याचे काम

  ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील : कारदगा येथे मराठी साहित्य संमेलन निपाणी (वार्ता) : मोबाईलच्या आक्रमणामुळे साहित्य, भाषा, माणसं, संवाद एकमेकांपासून दूर जात आहे. त्यामुळे साहित्य संमेलने माणसे जपण्याचे काम करत आहे. समाजाचा विकृत चेहरा बदलण्याची ताकद साहित्यामध्ये आहे. सकारात्मक साहित्याची निर्मिती होऊन समाज परिवर्तन करण्याचे काम नव्यापिढीसमोर उभे …

Read More »