नवी दिल्ली : आशिया कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 धुव्वा उडवला आणि स्पर्धेच्या जेतेपदावर चौथ्यांदा नाव कोरले. भारतीय संघ या स्पर्धेत अजेय राहिला. भारताने या स्पर्धेत एकही सामना गमवला नाही. सुपर 4 फेरीतील एकमेव सामना दक्षिण कोरियासोबत झाला होता. हा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. …
Read More »आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्या करणार नेतृत्व; शुभमन गिल उपकर्णधार
मुंबई : 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप 2025साठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाचा संघ जाहीर केला. यंदाचा आशिया कप टी-20 स्वरूपात रंगणार असून टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या …
Read More »महाराष्ट्राची लेक ठरली बुद्धिबळाची राणी!
दिव्या देशमुखने वर्ल्ड कप जिंकून रचला इतिहास मुंबई : जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला …
Read More »बर्मिंगहॅममध्ये भारताचा इंग्लंडवर 336 धावांनी ऐतिहासिक विजय, मालिकेत बरोबरी
बर्मिंगहॅम : आकाश दीप आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांच्या जोडीने केलेल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय कसोटी संघाने इंग्लंडच्या भूमीत शुबमन गिल याच्या नेतृत्वात इतिहास घडवला आहे. भारताने इंग्लंडचा दुसर्या कसोटी सामन्यात 336 धावांनी धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र …
Read More »टी20 वर्ल्डकप 2026 चे वेळापत्रक जाहीर; 14 जून रोजी भारत-पाकिस्तान सामना
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून पुढच्या वर्षीच्या टी20 वर्ल्डकपसाठी जोरदारी तयारी सुरु झाली आहे. आयसीसीने महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धचे वेळापत्रक एक वर्षाआधीच जाहीर केलं आहे. या स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडकडे आहे. पुढच्या वर्षी वर्ल्डकप स्पर्धेचे दहावे पर्व आहे. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी संघांना एकाच गटात ठेवण्यात आले …
Read More »२७ वर्षांची प्रतीक्षा संपली अन् दक्षिण आफ्रिका ठरला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन!
लॉर्ड्स : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये रंगला. पाच दिवसांचा कसोटी सामना चौथ्या दिवशीच संपला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टेम्बा बावुमाच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे. तब्बल २७ वर्षांनी त्यांनी दुसरी आयसीसी ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने कमावली आहे. इंग्लंडमधील …
Read More »रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएल 2025 चा चॅम्पियन!
अहमदाबाद : 18 वर्षे… एक दीर्घ प्रतीक्षा, असंख्य अपेक्षा आणि लाखो चाहत्यांचा अटळ विश्वास. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अखेर 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2025 ची ट्रॉफी उंचावली. पंजाब किंग्जविरुद्धच्या अंतिम सामन्यात 06 धावांनी रोमांचक विजय मिळवून आरसीबीने 18 वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम दिला. हा विजय केवळ एक जेतेपद …
Read More »पंजाब किंग्सची अंतिम फेरीत धडक; मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून पराभव
अहमदाबाद : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा दुसरा क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात रंगला. या थरारक सामन्यात पंजाब किंग्सने 204 धावांचे लक्ष्य केवळ 19 षटकांतच पूर्ण करत 5 गडी राखून शानदार विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा यंदाचा प्रवास येथेच संपला असून, …
Read More »भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुबमन गिल याची नियुक्ती
मुंबई : भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदी युवा सलामीवीर शुबमन गिल याची नियुक्ती करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. मात्र त्याआधी कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. बीसीसीआय निवड …
Read More »‘किंग कोहली’ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती!
मुंबई : भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटून विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. रोहित शर्मापाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदयभंग झालाय हे निश्चितच! सोशल …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta